शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

हळूहळू वाढतेय कामांची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:12 IST

मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.समृद्ध महाराष्ट्रमधील कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या मागे मागील तीन वर्षांपासून लागले आहेत. त्यात आता हळूहळू यश येत आहे. मागील काही महिन्यांत ही कामे सुरू होत असल्याचे तर सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. सिंचन विहिरींची दहा हजारांपैकी ४३९१ कामे प्रशासकीय मान्यतेसह मंजूर केली. त्यापैकी २२४७ चालू असून याशिवाय ३७५ कामे पूर्ण झाली आहेत. यंदा दुष्काळात शेतकऱ्यांना या विहिरींचा फायदा झाला असता मात्र कामे पूर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे. १७६९ कामांना तर प्रारंभच नाही. अनेक गावांत उद्दिष्ट संपल्याचे सांगून नवीन काम दिले जात नाही. तर अनेक गावांत शेतकरी मंजूर आहे तेच काम करीत नाहीत. शेततळ्यांचे तर ५६00 एवढे उद्दिष्ट असताना केवळ ३२२ कामांनाच प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. यातील एकही काम अद्याप सुरू नाही. भूसंजीवनी व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 एवढ्या उद्दिष्टापैकी ३७३ कामे प्रशासकीय मंजुरीनंतर सज्ज आहेत. मात्र यापैकी केवळ तीन कामेच सुरू झाली आहेत. भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंगचे २२00 कामांचे उद्दिष्ट असून यापैकी ४६६ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तर १५ कामे सुरू झाली असून २ पूर्ण झाली आहेत. निर्मल शौचालय योजनेतही २२00 चे उद्दिष्ट असून २२६ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी १२0 कामे सुरू असून ८ पूर्ण झाली आहेत. निर्मल शोषखड्ड्यांचे २000 एवढे उद्दिष्ट असून ८८१ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी ४८७ सुरू तर ५0 पूर्ण झाली आहेत.अंकुर रोपवाटिकेच्या २ लाख २0 हजारांच्या उद्दिष्टापैकी प्रस्तावच ६५ आहेत. त्यापैकी ६0 कामांना मंजुरी दिली. यातील ५५ सुरू झाली तर ४ पूर्ण झाली आहेत. नंदनवन वृक्षलागवडीतही १६00 कामांचे उद्दिष्ट असून २३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली. यापैकी १८ कामे सुरू असून ५ सुरूच नाहीत. समृद्ध ग्राम योजनेतही १६00 पैकी ३६९ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. २७१ कामे सुरू असून याशिवाय ९0 कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे, गाव तलाव, वृक्षलागवड, व्हर्मी कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड यातील एकही काम पूर्ण झालेले नाही.दरवर्षी मजूर नसल्याची बोंब कायम असते. यंदा मात्र दुष्काळी स्थितीमुळे शेतीत इतर कामे नसल्याने शेतकºयांत जनजागृती केल्यास त्यांच्याकडूनच ही कामे करून घेणे शक्य आहे. प्रशासनाने ही संधी साधण्याची गरज आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSmart Cityस्मार्ट सिटी