शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

हिंगोलीतील आदिवासी प्रकल्पाच्या कामांचे राज्यपालांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 14:03 IST

Governor Bhagat Singh Koshyari in Hingoli : मागासलेल्या, आदिवासीबहुल भागाचा आढावा घेणे, सिंचन, पिण्याचे पाणी, शिक्षण आदी प्रश्नांवर जाण करून घेत त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी माझ्याकडे

ठळक मुद्देराज्यपालांनी सिंचनानंतर आदिवासींबाबतच्या उपाययोजनांच्या आढाव्यावर भर दिला.

हिंगोली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांनी हिंगोली येथील विश्रामगृहावर विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी आदिवासी विकास प्रकल्पाकडे विशेष लक्ष देवून माहिती घेतली. या विभागाचे चांगले काम असल्याची कौतुकाची थापही प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या पाठीवर मारली.

हिंगोली येथे सकाळी ११ वाजेच्या दरम्यान आगमन होताच त्यांना पोलीस दलाकडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी विश्रामगृहात सिंचनासह विविध बाबींचा आढावा घेतला. राज्यपालांनी सिंचनानंतर आदिवासींबाबतच्या उपाययोजनांच्या आढाव्यावर भर दिला. यावेळी प्रकल्प अधिकारी राठोड यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जिल्ह्यात असलेली व्यवस्था, शिक्षणाबाबत या प्रकल्पाला मिळालेले पंतप्रधान अॅवॉर्ड आदीची माहिती दिली. तसेच या विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या शबरी घरकुल योजना, चालकांना ऑटोचे वितरण, फर्निचर मेकिंग प्रशिक्षण आदींचीही माहिती दिली. तसेच यात किती लाभार्थ्यांना कसा लाभ मिळाला, हेही सांगितले. यावरून राज्यपाल कोश्यारी यांनी राठोड यांच्या कामाचे कौतुक केले. 

तसेच या विभागात किती वर्षांपासून काम करता, आयएएस आहेत का? मूळचे कोणत्या विभागाचे, तुमचे गाव कोणते व कोणत्या जिल्ह्यात असेही आपुलकीने विचारले. तसेच या विभागात आणखी काम करा, असेही सांगितले. राठोड हे मागील चार वर्षांपासून या विभागात असून मूळ ग्रामविकासचे असले तरीही आदिवासी प्रकल्पाचा त्यांच्याकडे पदभार आहे. या ठिकाणी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, आ.तान्हाजी मुटकुळे आदींची उपस्थिती होती. तर जवळपास सर्वच विभागांच्या प्रमुखांचीही उपस्थिती होती. हा आढावा घेतल्यानंतर त्यांनी काही जणांची निवेदनेही स्वीकारली. 

एका रस्त्यावर बाजारपेठ बंदहिंगोलीतील विश्रामगृह ते नांदेड नाका रस्त्यावरील बाजारपेठ या दौऱ्यासाठी बंद ठेवण्यात आली होती. तर राज्यपालाच्या दौऱ्यामुळे या मार्गावरील वाहतूकही इतरत्र वळविण्यात आली होती. जोपर्यंत राज्यपाल विश्रामगृहावर होते, तोपर्यंत तेवढाच रस्ता बंद ठेवून नंतर वाहतूक सुरळीत केली. 

सिंचनाच्या प्रश्नावर सरकारला सूचना देवू पत्रकारांशी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, राज्यपाल म्हणून मला मागासलेल्या, आदिवासीबहुल भागाचा आढावा घेणे, सिंचन, पिण्याचे पाणी, शिक्षण आदी प्रश्नांवर जाण करून घेत त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार मी या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलो आहे. ही सर्व माहिती घेतली तर राज्य व केंद्र सरकारशी बोलता येते. त्यावर निर्णय घेता येतात. या भागात काही अपूर्ण सिंचन योजना आहेत. मावेजा कमी मिळत असल्याने शेतकरी जमिनी देत नाहीत. शासन आता चारपट रक्कम मावेजा म्हणून देत आहे. पूर्वी कमी असायचा. त्यावर शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. अन्यथा सक्तीने भूसंपादन केले तरच हे विकास प्रकल्प होणार आहेत. यावर शासनाला निर्णय घ्यावा लागेल.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीHingoliहिंगोली