शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

'सरकारला सद्बुद्धी मिळो'; सोयाबीन दरवाढीसाठी बनीमीसमोर महाआरती

By संदीप शिंदे | Updated: October 19, 2023 18:47 IST

पानचिंचोलीत काॅग्रेसचे आंदोलन

निलंगा : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हणून सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उत्पादनासाठी केलेला खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. आंदोलने, मोर्चे काढूनही सरकारला जाग येत नसल्याने सोयाबीनचे दर वाढविण्यासाठी सद्बुद्धी यावी, यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पानचिंचोली येथे सोयाबीनच्या बनीमीसमोर कलश पूजा मांडून विधिवत पुजा करुन गुरुवारी महाआरती करण्यात आली.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस कमी झाल्याने आणि पिक फुलोऱ्यात असताना मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन उत्पन्नात मोठी घट झाली. एकरी दहा क्विंटल निघणारे सोयाबीन दोन क्विंटलच निघत आहे. २२ ते २५ हजार रुपये एकरी उत्पादन खर्च लागत आहे. त्या मानाने उत्पादनही होत नाही. त्यातच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. नवीन सोयाबीन बाजारात येताच ५ हजारांवरून ४२०० रुपयांवर दर घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट सोयाबीन बनमीसमोर पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचा फोटो लावून आम्ही शेतकरी अडचणीत आहोत आमच्या सोयाबीनला दर वाढवून द्यावा अशी मागणी करीत विधीवत पुजा करुन महाआरती केली.

यावेळी सुधाकर पाटील, ॲड. नारायणराव सोमवंशी, गंगाधर चव्हाण, दिनकर पाटील , विठ्ठल पाटील, प्रमोद मरूरे, बालाजी भुरे,श्रीकांत साळुंके, मदन बिरादार, मुजीब सौदागर, भगवान पाटील, बब्रुवान जाधव, दिलीप पाटील, भगवान भांगे, साहेबराव पाटील, काकासाहेब पाटील, दिनकर गवळी, नागु जगदाळे, बालाजी काळे, माधव दिवे, उमाकांत कुलकर्णी, मधुकर दिवे, दस्तगीर सय्यद, पाशु सय्यद, मुस्तफा पटेल, ज्ञानोबा धाबळे, ज्ञानबा जाधव, जलील शेख, शुभम जाधव, सिद्धू जाधव, अर्जुन कदम, बालाजी बिराजदार, दीपक दिवे, गुरुनाथ जाधव, दिलीप काळे, पिंटू काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी