शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

'गंगामाय शांत हो...'; रौद्ररुपी कयाधू नदीची महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 16:26 IST

rain in Hingoli : रौद्ररुप धारण केलेल्या नदीमातेला शांत करण्यासाठी ' बोळवण ' करण्याची परंपरा.... 

ठळक मुद्देभरून वाहणारी कयाधू नदी काल रात्री तीन वाजल्यापासून महापुराच्या रुपात आहे.

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : गेल्या चार दिवसापासून दुथडी भरून वाहणाऱ्या कयाधू नदीने आज रौद्ररूप धारण केले असून परिसरातील सर्व शेती पुराखाली गेली आहे. नदीचे हे विक्राळ रूप शांत करण्यासाठी डोंगरगाव पूल येथील महिलांनी नदीची साडीचोळी, खणा-नारळाने ओटी भरून पूजा केली आहे. ' गंगामाय शांत हो...' असे म्हणत नदीला मनोभावे पूजत हे संकट दूर करण्यासाठी विनंती केली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असून काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरू आहे .या पावसामुळे परिसरातील नदी,नाले ,ओढे ,तुडुंब भरून वाहत असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरून वाहणारी कयाधू नदी काल रात्री तीन वाजल्यापासून महापुराच्या रुपात आहे. नदीला महापूर आला असून परिसरातील शेती पुराखाली गेली आहे. सोयाबीनचे, हळदीचे, कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर कमी होईल या आशेवर नदीकाठच्या गावातील लोक बसले होते . परंतु वरचेवर पुराचे पाणी वाढत आहे. बाळापुर नजीक डोंगरगाव पूल येथे नदीने विक्राळ रूप धारण केले आहे. 

Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण

नदीमधील मंदिराचा कळस बुडत असून त्याचा झेंडा बुडला की राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद होतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा महापूर शांत व्हावा यासाठी डोंगरगाव येथील महिलांनी नदीची मनोभावे पूजा केली. साडी, चोळी, खारीक खोब-याचे, तांदूळ, हळदीचे कोंब हे साहित्य वाहून नदीची मनोभावे पूजा केली आहे. ' गंगामाय शांत हो...' असे साकडे घातले आहे. ' विक्राळ रूप शांतकरून परिसरात समृद्धी नांदू दे...' असे मागणे यावेळी डोंगरगाव पूल येथील सुनीता क्षीरसागर, संगीता पावडे या महिलांनी पुराच्या पाण्यात पूजा करून केली. तर गावातील सिताराम परसराम शिरफुले यांनी साडी चोळी पुराच्या पात्रात नेऊन सोडली. 

नदी मुलीचे प्रतिकनदीने रौद्ररूप धारण करून परिसरात नुकसान सुरु केले की नदीला शांत करण्यासाठी तिची बोळवण केली जाते. गंगा ही मुलीसमान असून मुलगी रागावली की तिला शांत करण्यासाठी तिची बोळवण करतात अशी प्रथा या नदीकाठच्या गावांमध्ये आहे .आज नदीला महापूर आल्यामुळे तिला शांत करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये अशा पद्धतीची पूजा सुरू झाली आहे.

गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

टॅग्स :RainपाऊसfloodपूरHingoliहिंगोली