शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'गंगामाय शांत हो...'; रौद्ररुपी कयाधू नदीची महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 16:26 IST

rain in Hingoli : रौद्ररुप धारण केलेल्या नदीमातेला शांत करण्यासाठी ' बोळवण ' करण्याची परंपरा.... 

ठळक मुद्देभरून वाहणारी कयाधू नदी काल रात्री तीन वाजल्यापासून महापुराच्या रुपात आहे.

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : गेल्या चार दिवसापासून दुथडी भरून वाहणाऱ्या कयाधू नदीने आज रौद्ररूप धारण केले असून परिसरातील सर्व शेती पुराखाली गेली आहे. नदीचे हे विक्राळ रूप शांत करण्यासाठी डोंगरगाव पूल येथील महिलांनी नदीची साडीचोळी, खणा-नारळाने ओटी भरून पूजा केली आहे. ' गंगामाय शांत हो...' असे म्हणत नदीला मनोभावे पूजत हे संकट दूर करण्यासाठी विनंती केली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असून काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरू आहे .या पावसामुळे परिसरातील नदी,नाले ,ओढे ,तुडुंब भरून वाहत असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरून वाहणारी कयाधू नदी काल रात्री तीन वाजल्यापासून महापुराच्या रुपात आहे. नदीला महापूर आला असून परिसरातील शेती पुराखाली गेली आहे. सोयाबीनचे, हळदीचे, कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर कमी होईल या आशेवर नदीकाठच्या गावातील लोक बसले होते . परंतु वरचेवर पुराचे पाणी वाढत आहे. बाळापुर नजीक डोंगरगाव पूल येथे नदीने विक्राळ रूप धारण केले आहे. 

Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण

नदीमधील मंदिराचा कळस बुडत असून त्याचा झेंडा बुडला की राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद होतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा महापूर शांत व्हावा यासाठी डोंगरगाव येथील महिलांनी नदीची मनोभावे पूजा केली. साडी, चोळी, खारीक खोब-याचे, तांदूळ, हळदीचे कोंब हे साहित्य वाहून नदीची मनोभावे पूजा केली आहे. ' गंगामाय शांत हो...' असे साकडे घातले आहे. ' विक्राळ रूप शांतकरून परिसरात समृद्धी नांदू दे...' असे मागणे यावेळी डोंगरगाव पूल येथील सुनीता क्षीरसागर, संगीता पावडे या महिलांनी पुराच्या पाण्यात पूजा करून केली. तर गावातील सिताराम परसराम शिरफुले यांनी साडी चोळी पुराच्या पात्रात नेऊन सोडली. 

नदी मुलीचे प्रतिकनदीने रौद्ररूप धारण करून परिसरात नुकसान सुरु केले की नदीला शांत करण्यासाठी तिची बोळवण केली जाते. गंगा ही मुलीसमान असून मुलगी रागावली की तिला शांत करण्यासाठी तिची बोळवण करतात अशी प्रथा या नदीकाठच्या गावांमध्ये आहे .आज नदीला महापूर आल्यामुळे तिला शांत करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये अशा पद्धतीची पूजा सुरू झाली आहे.

गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

टॅग्स :RainपाऊसfloodपूरHingoliहिंगोली