शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच पाण्याचे मडके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ : शहरात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला चार दिवसांआड दहा मिनिटेच पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शहरात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला चार दिवसांआड दहा मिनिटेच पाणी येत असल्याने संतप्त आंदोलक महिलांनी नगरपंचायतीत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोरच मडके फोडून संताप व्यक्त केला.नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. याकडे मात्र नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याची ओरड सुरु आहे. सोमवारी प्रभाग क्रमांक १५ महिलांनी नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता. तर यावेळी महिला एवढ्या संतप्त झाल्या होत्या की, महिलांनी अक्षरश: मुख्याधिकाºयांच्या कक्षासमोरच रिकामे पाण्याचे मडके फोडले. त्यानंतर निवेदन दिले. यापुढे जर सुरळीतपणे पाणी नळाला नाही सोडले तर आंदोलन अधिक तीव्र करून घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलांनी नगरपंचायतला दिला आहे.प्रभाग क्रमांक ७ व १५ या प्रभागात नळाला सुरळीत पाणी येत नाही. त्यामुळे मोर्चात महिला हंडे घेऊन हजर झाल्या.या निवेदनावर नगरसेवक सुमेध मुळे, लक्ष्मी काळे, पार्वती देशमुख, छाया तोंडे, निर्मला राऊत, राजाबाई पालक, सुनिता गोरे, शेख अजनबी, चंद्रकला राऊत, प्रल्हाद काळे, भगवान देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, पवन राऊत, प्रल्हाद पालक आदींच्या स्वाक्षºया आहेत. लवकरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. नळाला सात दिवसांत केवळ दहा मिनिटेच पाणी येते. त्यामुळे पाणी दोन दिवसही पुरत नसल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.पाणीपुरवठा सुरळीत करू - चौंढेकरशहराला सध्या दोन दिवस आड पाणी देण्यात येत आहे, परंतु विद्युतपंप जळाल्याने पाणी टाकीमध्ये आले नाही. त्यामुळे प्रभागात पाणी जायला उशीर झाला आहे. यानंतर औंढा तलावातून नवीन पूरक पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे पाणीपुरवठा सुरळीत होईल. असे नगराध्यक्षा सविता चौंढेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater scarcityपाणी टंचाई