शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

रुजू झालेल्या अधिकाऱ्यांसमोर दुहेरी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:36 AM

येथील पंचायत समिती कार्यालयाचा अनागोंदी कारभारामुळे पंचायत समितीत आजपर्यंत रुजू झालेले गटविकास अधिकारी वर्षभरही टिकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सेनगाव पं. स.चा कारभार पुर्णत: ढेपाळला असून नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकाºयांसमोर आता दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयाचा अनागोंदी कारभारामुळे पंचायत समितीत आजपर्यंत रुजू झालेले गटविकास अधिकारी वर्षभरही टिकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सेनगाव पं. स.चा कारभार पुर्णत: ढेपाळला असून नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकाºयांसमोर आता दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे.सेनगाव पंचायत समिती कार्यालयाला कारभार सर्वश्रुत आहे. कार्यालयात प्रामुख्याने अकार्यक्षम, कामचुकार, कारवाई होऊन पदस्थापना मिळालेल्या अधिकारी कर्मचाºयांचा भरणा जास्त आहे. दौºयांच्या नावाखाली कार्यालयातील कार्यरत कर्मचारी -अधिकारी सातत्याने गैरहजर राहतात. कार्यालयात उशिरा येणे, अनधिकृत गैरहजर राहणे, सर्वसामान्य नागरिकांशी उद्धट वागणे, कार्यालयात मद्यप्राशन करून येणे, कामात अनियमितता, मुख्यालयी न राहणे अशा अनेक प्रकारामुळे सेनगाव पंचायत समिती चांगलीच चर्चेत येत आहे.सेनगाव येथील पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळत नाही अन् मिळाला तर सदर गटविकास अधिकाºयांवर कारवाई होते. किवा हे अधिकारी सहा महिने- वर्षभरात बदली करून आपली सुटका करून घेतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.या गोंधळात पंचायत समितीचा कारभार कायम प्रभारी गटविकास अधिकाºयांवर लादला जातो. त्यामुळे तालुक्यातील जनता पुरती वैतागली असून पदाधिकारीही हतबल झाले आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात पं. स. च्या सर्व पदाधिकाºयांनी एकत्र येऊन कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या नामुष्कीची वेळ ओढावली होती. पंरतु निगरगट्ट अधिकारी -कर्मचाºयांवर या प्रकाराचा कुठलाही परिणाम झाला नसून मनमानी कार्यपद्धती चालूच आहे.या खडतर परिस्थितीत शनिवारी गटविकास अधिकारीपदी के.व्ही.काळे रुजू झाले. सेनगावला नवीन गटविकास अधिकारी मिळाल्याने मात्र जनतेच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. पं.स.चा ढेपाळलेला कारभार सुधारावा अशी जनतेची मागणी आहे. रुजू झालेले गटविकास अधिकारी काळे यांच्यासमोर सेनगाव पं.स. कार्यालयाचा कारभार सुधारणे त्याच बरोबर तीन वर्ष टिकण्याचे आव्हान आहे. विशेष म्हणजे नवीन रूजू झालेले अधिकारी खरंच बदल करतील काय? सेनगाव पंचायत समितीचा ढेपाळलेला कारभार सुधारेल का? तसेच कार्यालयातील उशिरा येणाºया कर्मचाºयांना आळा बसेल काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे सर्व प्रश्न सुटल्यास खरोखरच पंचायत समितीचा कारभार सुरळीत होण्यास मदत होणार आहे.