शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सिंचन अनुशेषातील कामे करण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:37 IST

जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.मुटकुळे यांनी जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा मुद्दा शासन दरबारी व राज्यपालांकडे चांगलाच लावून धरला होता. त्यानंतर १५६९0 हेक्टरचा अनुशेष मंजूर झाला. शिवाय १७६ कोटींच्या कामांचा आराखडाही मंजूर झाला होता. मात्र ही कामे पुढील मंजुरीसाठी गोदावरी खोरे महामंडळामार्फत जलविज्ञान विभागाकडे गेल्यावर त्यांनी पाणी वापर उपलब्धता नसल्याचे सांगितले. आधीच २८ दलघमी एवढा जास्त पाणीवापर असल्याचे सांगितले. त्यामुळे नव्याने कामे करण्यास मंजुरी नाकारली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आ.मुटकुळे यांनी प्रस्तावित सापळी धरणासाठी आरक्षित २४0 दलघमीपैकी ६१ दलघमी पाण्याची उपलब्धता करून देण्यास मुख्य सचिवांची मान्यता मिळविली. त्यामुळे आता ही कामे होण्यातील अडथळा दूर झाल्याचे ते म्हणाले.हिंगोली जिल्ह्यात नदीवर १४ बंधारे असून २४ तलावांची कामे होणार आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना सिंचनाचे महत्त्व पटल्याने त्यांनी जमिनी देण्यासही होकार दिला आहे. सिंचनाच्या क्षेत्रात अजूनही वाव असून ही कामे झाल्यावर पुढील रणनीती ठरविता येईल. मात्र सिंचनच्या प्रशासनाने यात एवढे दिवस अडथणे आणल्याने या कामांना विलंब होत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकारwater scarcityपाणी टंचाई