शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुष्यमान’ अंतर्गत मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:02 IST

केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून, या आरोग्य योजनेमुळे जिल्ह्यातील १ लाख ७ हजार २८ कुटुंबाना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.गोरेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घुबडे आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री कांबळे म्हणाले आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेसोबतच राज्य शासनाची ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ ही एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. आयुष्यमान जन आरोग्य योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असून, यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही. योजने अंतर्गत १३०० हून अधिक गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार केले जातील. रुग्णांना हे उपचार देशातील कोणत्याही शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये घेता येतील. या योजनेमुळे देशातील नगारिकांना आरोग्य सुरक्षा प्राप्त झाली असून, नागरिकांनी या योजने अंतर्गत आरोग्याची तपासणी करुन घेत गंभीर आजारापासून सावध राहण्याकरिता वेळीच निदान करुन घ्यावे. तसेच नागरिकांनी अपघात विमा काढून घ्यावा असेही आवाहन कांबळे यांनी केले. यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे कार्डचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Hingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीHealthआरोग्य