शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाळूघाट लिलावांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:21 IST

न्यायालय आदेशामुळे थांबलेली वाळूघाट लिलावाची प्रक्रिया ही स्थगिती उठल्यामुळे पुन्हा सुरू झाली आहे. राखीव ठेवायचे घाट निश्चित केल्यानंतर उर्वरित घाटांचे लिलाव काढण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : न्यायालय आदेशामुळे थांबलेली वाळूघाट लिलावाची प्रक्रिया ही स्थगिती उठल्यामुळे पुन्हा सुरू झाली आहे. राखीव ठेवायचे घाट निश्चित केल्यानंतर उर्वरित घाटांचे लिलाव काढण्यात येणार आहेत.हिंगोली जिल्ह्यातील २६ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र मध्येच न्यायालयाने स्थगिती दिल्याचे पत्र धडकले अन् ही प्रक्रिया थंड बस्त्यात गेली. त्यानंतर जिल्ह्यात विविध भागातील वाळू घाटांवरून अवैध उपशाने जोर पकडला आहे. अजूनही हा प्रकार थांबला नसून मध्यंतरी काही भागात पथकांनी कारवाई केली. तर काही भागात नुसतेच कारवाईचे नाटक सुरू आहे.दरम्यान, आता न्यायालयाने स्थगिती उठविल्याने वाळू घाट लिलावाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यापूर्वी निश्चित केल्याप्रमाणे हिंगोली तालुक्यातील खेर्डा, दुर्गधमाणी, हिंगणी, सेनगाव तालुक्यातील सालेगाव, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा, कोंढूर, डोंगरगाव पूल, चिखली, चाफनाथ, कान्हेगाव, डिग्रस त.को., सावंगी भू, सापळी, पिंप्री बु., औंढा तालुक्यातील आजरसोंडा, नालेगाव, पूर, अंजनवाडी, भगवा, चिमेगाव, पोटा खु., पोटा बु., अनखळी, तपोवन, दरेगाव, माथा या घाटांची लिलावप्रक्रिया होणार होती. मात्र यापैकी काही घाट शासकीय कामांसाठी राखीव करण्यात येणार आहेत. यासाठी बांधकामाशी संबंधित विविध विभागांना पत्र दिले आहे. या विभागांनी मागणी केलेले घाट वगळता इतर घाटांतील वाळूच्या लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे राखीव घाटांची प्रतीक्षा लागली आहे.सध्या महसूल विभागासमोर वाळूचा अवैध उपसा रोखण्याचे मोठे आव्हान आहे. हा उपसा रोखला तरच हे घाट लिलावात जाणार आहेत. अन्यथा या घाटात वाळूच शिल्लक राहिली नाही तर वाळू घाट घेणार कोण? हा प्रश्न आहे. काही ठिकाणी तर अधिकाऱ्यांची मूकसंमतीच या घाटांना रिते करण्यास कारणीभूत ठरू लागली आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तंबी दिल्याने काही दिवस कारवाईचे नाटक चालले. आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. त्यामुळे प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.विविध विभागांना शासकीय कामांसाठी लागणाºया वाळूसाठी किती घाट राखीव होतात, यावरून २६ पैकी किती घाटांचा लिलाव होईल, हे निश्चित होणार आहे.महसुलाला वसमतमध्ये लागला सुरुंगवसमत : वसमत तालुक्यात वाळूमाफिया व पुरवठादारांच्या लॉबीने अवैध उपशाचा सपाटा लावला आहे. तालुक्यात वाहतूक होणाºया वाहनांची संख्या पाहता रेती घाटांचे लिलाव होण्याच्या तारखेपर्यंत घाटातील रेती लंपास होण्याची भिती आहे. महसूल उत्पन्नाला लागलेल्या सुरूंगाला थोपवण्या अवघड आव्हान महसूल यंत्रणेसमोर आहे.महसूल यंत्रणा नदी घाटातून उपसा होत नाही याची खबरदारी घेत असले तरी तालुक्यातील रिचार्ज झालेले रेती माफीया व बहाद्दर पुरवठादार महसूल यंत्रणेवर वरचढ चढत असल्याचेच चित्र आहे. वसमतमध्ये रात्री अपरात्री रेती घेवून येणारी वाहने व ओली व दर्जेदार रेती पाहता ताजे उत्खनन करूनच ही रेती येत आहे. हे स्पष्ट दिसत आहे. ढवूळगाव-माटेगाव परिसरात ठरावीक ट्रॅक्टरमार्फत नदीतून रेती जमा करून ती ठरावीक वाहतूकदारांच्या माध्यमातून पुरवठा होत आहे. रेतीअभावी बांधकाम बंद असल्याच्या तक्रारी इतर तालुक्यातून येत असल्या तरी वसमत तालुक्यात रेती अभावी बांधकाम बंद असल्याचे चित्र नाही. रेती घाटातून चोरी करून रेती लंपास होते, असा युक्तीवाद होत असला तरी एखादे ट्रॅक्टर चोरीचे येवू शकते. १५ ते २० टिप्पर किंवा ट्रक जेव्हा एकाच मार्गावर वाहतूक करत असतील तर या प्रकारास चोरी ही संज्ञा देणेही जिकरीचे ठरणारे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर रेतीचा उपसा होत असला तर तालुक्याती रेती घाटाचे लिलाव होईपर्यंत घाटात किती रेती शिल्लक राहील, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीCourtन्यायालय