शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उन्हाळ्यात पूर्णा शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली; सिद्धेश्वर धरणातून मोठा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:06 IST

पूर्णा शहरासाठी नदीपात्रात सोडला विसर्ग;सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले

- हबीब शेखऔंढा नागनाथ ( हिंगोली) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत पूर्णा शहराच्या मुख्याधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असून त्याद्वारे पूर्णा शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिद्धेश्वर धरणातून २० नोव्हेंबर २०२४ पासून नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतीच्या सिंचनासाठी निरंतर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. आता १ मार्चपासून उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन देण्यात येत आहे. त्यातच सिद्धेश्वर जलाशयावर अवलंबून असलेल्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्णा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी केल्याने ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे १ फूट उचलून २ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पूर्णा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा शहरालगतचा कोल्हापुरी बंधारा भरेपर्यंत पुढील तीन ते चार दिवस पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पूरप्रवण क्षेत्र तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘सिद्धेश्वर’ मध्ये ३६ टक्के जिवंत साठा...तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून हिंगोलीसह परभणी व नांदेड या तीन जिल्ह्यांतील ५७ हजार हेक्टर शेतीचे सिंचन केले जात आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत रब्बी हंगामाच्या तीन पाणी पाळ्या देण्यात आल्या असून १ मार्चपासून उन्हाळी हंगामाच्या पहिल्या आवर्तनास सुरुवात करण्यात आली. प्रत्येक अवर्तनाला कमीतकमी ६० दलघमी पाण्याची आवश्यकता असते. परंतु सिद्धेश्वर जलाशयात आजमितीस केवळ ३० दलघमी (३७ टक्के) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पूर्णा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे.

येलदरी धरणातून पाण्याची आवक...लाभक्षेत्रातील शेतीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. पुढील पाणीपाळीस अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पाणीपातळी स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून येलदरी धरणाचे दोन विद्युत निर्मिती टर्बाइन चालू करण्यात आले असून त्याद्वारे सिद्धेश्वर जलाशयाचा पाणी साठा स्थिर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीDamधरणAgriculture Sectorशेती क्षेत्र