शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 19:55 IST

नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना

हबीब शेख,औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : शनिवारी दुपारी येलदरी धरणाची दोन विद्युत जनित्रे चालू करून १ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. परिणामी सिद्धेश्वर जलाशयाच्या पाणीपातळीत रविवारपासून वाढ होत आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून ५ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. तसेच जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे खडकपूर्णा धरणातून जवळपास ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता. त्यामुळे २४ तासांत येलदरी धरण १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्याने १२ ऑक्टोबर रोजी दुपारी धरणाचे दोन विद्युत टर्बाइन चालू करून विद्युतनिर्मितीद्वारे १ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. परिणामी शंभर टक्के जलसाठा असलेल्या सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे १३ ऑक्टोबर रोजी धरणाचे ४ दरवाजे १ फुटाने उघडून ३ हजार २९० क्युसेक, तर सांडव्यावरून १ हजार ७५० क्युसेक असे एकूण ५ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला.

नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचनायेलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप परतीच्या पावसाने हजेरी लावली नसली तरी खडकपूर्णा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे दोन्ही धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाल्यास विसर्गाच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, पूरप्रवण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली