शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

कयाधू नदीचा पूर पाहण्याची हौस बेतली जीवावर; प्रसंगावधान राखून आठ जणांची ग्रामस्थांनी केली सुटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:23 IST

कयाधू नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आज सकाळी खास रिक्षा करून शेवाळा येथील पुलावर आलेले आठजण पुरात अडकले.

आखाडा बाळापूर (हिंगोली ) : कयाधू नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आज सकाळी खास रिक्षा करून शेवाळा येथील पुलावर आलेले आठजण पुरात अडकले. मात्र, प्रसंगावधान राखून कवडी येथील ग्रामस्थांनी त्यांना सुखरूप बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला. 

हदगाव तालुक्यातील नेवरी गावातील विलास इंगळे, बालाजी शिंदे ,संतोष सुर्यवंशी ,किशोर खिल्लारे ,श्रीकांत वानखेडे, उत्तमराव खिल्लारे, रामदास शिंदे, अाबाराव काळे हे आज सकाळी पूर पाहण्यासाठी कयाधू नदी काठावर खास रिक्षा करून आले. शेवाळा जवळ रिक्षा थांबवून ते जवळच्या पुलावर गेले. मात्र येथे उभे असताना अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढली. बघता बघता पाणी कंबरेपर्यंत आले. यामुळे या आठही जण घाबरली, मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा सुरु केला. परंतु,  पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शेवाळा गावच्या बाजूने त्यांना वाचवण्यासाठी कोणीही जाऊ शकले नाही. तर दुसऱ्या बाजूस कोणीच उपस्थित नव्हते. 

दरम्यान, बाळापुर पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कवडी गावचे उपसरपंच दयानंद पतंगे यांना फोन करून ही माहिती दिली. माहिती मिळताच उपसरपंच पतंगे यांनी संदीप गावंडे व राजू पतंगे यांच्यासह शेवाळा पुलाकडे धाव घेतली. येथे हातांची साखळी करत त्यांनी आठही जणांना प्रयत्नपूर्वक सुखरूप बाहेर काढले. यानंतर आठही जण नेवरी गावास परतले. 

 

टॅग्स :riverनदीfloodपूरHingoliहिंगोली