शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गंभीर आजारावर पाच लाखांची शासन मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:49 IST

मुख्यमंत्री सहायता निधीसह म.फुले जीवनदायी योजनेत गंभीर आजारावर मिळणारा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा. आरोग्य विभागाचे काम चांगले असून गावातच लोकांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुख्यमंत्री सहायता निधीसह म.फुले जीवनदायी योजनेत गंभीर आजारावर मिळणारा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा. आरोग्य विभागाचे काम चांगले असून गावातच लोकांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केले.तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, शासनाने आरोग्याविषयी विविध उपाय केले आहेत. ग्रामपातळीवर यासाठी शासनाने यंत्रणा उभी केली आहे. त्यांच्यामार्फत लोकांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर योजनेचा लाभ मिळायला विलंब होतो. त्यामुळे रुग्णांना लक्षणानुसार वरच्या रुग्णालयात पाठविले तर योग्य वेळेत निदान होऊन शासन रुग्णांसाठी खर्च करीत असलेली रक्कम उपयोगात येईल. आपला जिल्हा आरोग्य सुविधा देण्यात राज्यात तिसऱ्या स्थानी आहे. मात्र हा भाग आणि परिस्थिती पाहता आपण पहिल्या स्थानीच आहोत असे मानले पाहिजे. तरीही पहिल्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न सोडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी मंचावर महिला व बालकल्याण अधिकारी गणेश वाघ, भानुदास जाधव, संतोष टेकाळे, अ‍ॅड. अमोल जाधव, खेडेकर, शिंदे, कोटकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.नामदेव कोरडे यांनी केले. यावेळी तालुक्यातून आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थात्मक प्रसुतीचे काम ९४ टक्क्यांवर पोहोचले असून जननी सुरक्षा योजनेत एप्रिलपासून आजपर्यंत ३४२ महिलांना लाभ दिला. पीएमएमव्हीवाय योजनेत १२६८ जणांना लाभ दिल्याचे सांगण्यात आले. मुलींचा जन्मदर हजारामागे ९८८ एवढा आहे. यात चांगली सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. तर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात शाळांमध्ये ५0८ जणांना संदर्भ सेवा दिली. तर अंगणवाड्यांतून ५१८ जणांना संदर्भसेवा दिल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स