शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महामंडळाचे पाचशे कर्ज प्रस्ताव पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:58 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत पाथरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसायासाठी ५०० कर्जप्रस्ताव बँकेकडे सादर केले आहेत; परंतु, अद्यापपर्यंत बँकांकडून एकही प्रस्ताव निकाली काढण्यात आला नाही.

ठळक मुद्देकार्यवाही होईना : लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप

पाथरी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत पाथरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसायासाठी ५०० कर्जप्रस्ताव बँकेकडे सादर केले आहेत; परंतु, अद्यापपर्यंत बँकांकडून एकही प्रस्ताव निकाली काढण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये बँक प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी १० लाख रुपयांच्या कर्जावर व्याजमाफीची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे.आॅनलाईन पद्धतीने महामंडळाकडे नोंदणी केल्यानंतर एलओआय प्रमाणपत्र उपलब्ध होते. हे प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यानंतर व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकेकडे दाखल करण्यात येते आहे. विशेष म्हणजे, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा महिनाभरापूर्वी जिल्हा दौरा झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून सुशिक्षित बेरोजगारांनी महांमडळाकडे नोंदणी केली आहे. पाथरी शहरात चार राष्टÑीयकृत बँका आहेत. यामध्ये भारतीय स्टेट बँक, महाराष्टÑ ग्रामीण बँक व बँक आॅफ महाराष्टÑ बँकेचा समावेश आहे.या बँक शाखेकडे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी व्यवसायासाठी ५०० प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र अद्यापपर्यंत एकाही प्रकरणाचा बँकेकडून निपटारा करण्यात आला नाही. बँकेकडून प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे बेरोजगार युवक बँकेत खेटे मारीत आहेत.उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्रअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्ज देण्यास बँका ठोस निर्णय घेत नसल्याने सकल मराठा समाजाच्या पदाधिका-यांनी उपजिल्हाधिकारी व्ही.एल. कोळी यांची भेट घेऊन याबाबत गा-हाणे मांडले.या युवकांच्या मागणीवरून उपजिल्हाधिकारी व्ही.एल. कोळी यांनी शहरातील चारही राष्टÑीयकृत बँकांना लेखी पत्र काढून महामंडळांतर्गत प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा करून अहवाल सादर करण्याचे कळविले आहे.मोफत प्रमाणपत्रांचे वाटपअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांकडून बेरोजगार युवकांना कर्जाचे व्याज माफ करण्याची योजना असल्याने पाथरी येथील मावळा संघटनेच्या वतीने महामंडळाचे जवळपास ५०० नोंदणीचे एलओआय प्रमाणपत्र मोफत काढून दिले आले आहेत.

मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडे नोंदणी करून कर्ज प्रकरणे बँकांकडे दाखल होत आहेत. मात्र बँका लाभार्थ्यांची अडवणूक करीत आहेत. यामुळे उपजिल्हाधिकारी व्ही.एल. कोळी यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर आता बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत.-अमोल भाले, विभागीय अध्यक्ष, मावळा संघटना

टॅग्स :HingoliहिंगोलीbankबँकSocialसामाजिक