शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या हप्त्यातच अडकली घरकुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:12 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांचा चौथा हप्ता अजून मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांचा चौथा हप्ता अजून मिळाला नाही.घरकुल योजनेतील रक्कम मिळत नसल्याने लाभार्थी हैराण आहेत. अनेकजण पंचायत समितीच नव्हे, जिल्हा परिषदेच्या घिरट्या घालताना दिसत आहेत. यात २0१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवासचे १0४७ तर रमाईचे ११८७ एवढे उद्दिष्ट होते. प्रधानमंत्री आवासमध्ये ५३३ कामांना मंजुरी दिली व ४८३ जणांचे जिओ टॅगिंग झाले. ३४७ जणांना पहिला तर १७ जणांना दुसरा हप्ता दिला. ४९३ जणांची खातेपडताळणी झाली. उर्वरितांचे मात्र अजून कशातच काही नाही. रमाई घरकुलमध्ये तर केवळ ३३ जणांचीच नोंदणी झाली. कामाचा पत्ता नाही. त्यामुळे लाभार्थ्यांतून होणारी ओरड रास्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.२0१६-१७ चा विचार केला तर प्रधानमंत्री आवासमध्ये ३७१५ एवढे उद्दिष्ट होते. यापैकी ३४८४ जणांना मंजुरी मिळाली होती. ३३१३ जणांना पहिला हप्ता मिळाला होता. त्यापैकी केवळ एकालाच चौथा हप्ता मिळाला. यात ८७९ घरकुल पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. याच वर्षातील रमाई योजनेतील १0७९ घरकुलाच्या उद्दिष्टापैकी १0४२ ला मंजुरी दिली होती. त्यापैकी ९६७ जणांना पहिला हप्ता मिळाला. १९४ जणांना तिसरा हप्ता दिला.यात २१९ कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. शब्री घरकुल योजनेत उद्दिष्टातील सर्व २२७ घरकुल मंजूर झाले. २२१ जणांना पहिला तर यापैकी ५८ जणांना तिसरा हप्ता दिला. ६३ कामे पूर्ण झाली. पारधी घरकुलमधील १३ कामांपैकी ५ कामे तिसºया हप्त्यापर्यंत पोहोचली. ही कामे पूर्णही झाली.अडचण : ५ हजारांपैकी ११६६ पूर्णया योजनेत २0१६-१७ चा विचार केला तर विविध योजनांत ५0३४ घरकुलांना मंजुरी दिली. यापैकी ५३७३ जिओ टॅगिंग केलेले आहेत. ४५११ जणांना पहिला हप्ता दिला. पाचशे जण अजून पहिला हप्ताच न मिळालेले आहेत. तर तिसरा हप्ता दिलेले केवळ ९८0 जण आहेत. त्यामुळे चार हजार घरकुललाभार्थी निधीअभावी चाचपडताना दिसत आहेत. प्रशासनाकडून मात्र तांत्रिक अडचणींचे कारण सांगितले जात आहे. अनेकांचे बँक खातेच जुळत नसल्याचेही समोर येत असून ही अडचण दूर करण्यात मात्र दिरंगाई केली जात आहे.