शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पहिल्या हप्त्यातच अडकली घरकुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:12 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांचा चौथा हप्ता अजून मिळाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजनेत यावर्षीच्या १0४७ पैकी केवळ ३४७ जणांनाच पहिला हप्ता मिळाला आहे. यात मंजुरीच ४९३ जणांना मिळाली. त्यामुळे अनेकजण निधीची प्रतीक्षा करीत आहेत. तर गतवर्षीच्या साडेचार हजार जणांचा चौथा हप्ता अजून मिळाला नाही.घरकुल योजनेतील रक्कम मिळत नसल्याने लाभार्थी हैराण आहेत. अनेकजण पंचायत समितीच नव्हे, जिल्हा परिषदेच्या घिरट्या घालताना दिसत आहेत. यात २0१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवासचे १0४७ तर रमाईचे ११८७ एवढे उद्दिष्ट होते. प्रधानमंत्री आवासमध्ये ५३३ कामांना मंजुरी दिली व ४८३ जणांचे जिओ टॅगिंग झाले. ३४७ जणांना पहिला तर १७ जणांना दुसरा हप्ता दिला. ४९३ जणांची खातेपडताळणी झाली. उर्वरितांचे मात्र अजून कशातच काही नाही. रमाई घरकुलमध्ये तर केवळ ३३ जणांचीच नोंदणी झाली. कामाचा पत्ता नाही. त्यामुळे लाभार्थ्यांतून होणारी ओरड रास्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.२0१६-१७ चा विचार केला तर प्रधानमंत्री आवासमध्ये ३७१५ एवढे उद्दिष्ट होते. यापैकी ३४८४ जणांना मंजुरी मिळाली होती. ३३१३ जणांना पहिला हप्ता मिळाला होता. त्यापैकी केवळ एकालाच चौथा हप्ता मिळाला. यात ८७९ घरकुल पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. याच वर्षातील रमाई योजनेतील १0७९ घरकुलाच्या उद्दिष्टापैकी १0४२ ला मंजुरी दिली होती. त्यापैकी ९६७ जणांना पहिला हप्ता मिळाला. १९४ जणांना तिसरा हप्ता दिला.यात २१९ कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. शब्री घरकुल योजनेत उद्दिष्टातील सर्व २२७ घरकुल मंजूर झाले. २२१ जणांना पहिला तर यापैकी ५८ जणांना तिसरा हप्ता दिला. ६३ कामे पूर्ण झाली. पारधी घरकुलमधील १३ कामांपैकी ५ कामे तिसºया हप्त्यापर्यंत पोहोचली. ही कामे पूर्णही झाली.अडचण : ५ हजारांपैकी ११६६ पूर्णया योजनेत २0१६-१७ चा विचार केला तर विविध योजनांत ५0३४ घरकुलांना मंजुरी दिली. यापैकी ५३७३ जिओ टॅगिंग केलेले आहेत. ४५११ जणांना पहिला हप्ता दिला. पाचशे जण अजून पहिला हप्ताच न मिळालेले आहेत. तर तिसरा हप्ता दिलेले केवळ ९८0 जण आहेत. त्यामुळे चार हजार घरकुललाभार्थी निधीअभावी चाचपडताना दिसत आहेत. प्रशासनाकडून मात्र तांत्रिक अडचणींचे कारण सांगितले जात आहे. अनेकांचे बँक खातेच जुळत नसल्याचेही समोर येत असून ही अडचण दूर करण्यात मात्र दिरंगाई केली जात आहे.