शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खांडेगाव पाटीवरील चार दुकानांना आग; सोयाबीन, कापूस जळून खाक

By विजय पाटील | Updated: November 24, 2023 15:16 IST

५ लाख रुपयांचे नुकसान ; वसमत-परभणी मार्गावरील घटना

हिंगोली: परभणी-वसमत मार्गावरील खांडेगाव पाटीवरील अडतीसह चार दुकानांना शुक्रवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत दुकानांतील सोयाबीन, कापूस यासह इतर अन्नधान्य जळून खाक झाले. या घटनेत ५ लाख रुपयांवर नुकसान झाले आहे. सदर आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते.

वसमत-परभणी मार्गावरील खांडेगाव पाटीवर असलेल्या दुकानांना २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान अचानक आग लागली. या दुर्घटनेत व्यापारी ज्ञानेश्वर नरवाडे (रा. सातेगाव), गंगाधर हेगडे (रा. देऊळगाव) यांच्या दुकानातील सोयाबीन, कापूस जळून खाक झाले. तर डुकरे यांच्या हॉटेलमधील साहित्य जळाले. या घटनेत ५ लाखांवर नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे आग आटोक्यात येऊ शकली नाही. सदर आगीत अडत दुकानातील सोयाबीन, कापूस यासह इतर धान्य जळून खाक झाले आहे. आगीत ५ लाखांवर नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांना मिळाली. त्यांनी जमादार संजय गोरे, अजय पंडित यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.