शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

बोगस बियाणे विक्री प्रकरणात इंदूर येथील कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:32 IST

वसमत तालुक्यात १२८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशी तक्रार कृषी विभागाकडे केली.

ठळक मुद्देतक्रारी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणाचे एस ३३५ वाण खरेदी

वसमत (जि. हिंगोली) : सोयाबीनचे बोगस बियाणे विकून १२ शेतकऱ्यांची १ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी इंदूर येथील बियाणे कंपनी चालकाविरोधात पंचायत समितीचे कृषी अधिकारी गोविंद दहीवडे यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यात १२८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशी तक्रार कृषी विभागाकडे केली. तक्रारी देणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणाचे एस ३३५ वाण खरेदी करून वापरल्याची तक्रार होती़ वाढत्या तक्रारी पाहता कृती विभागाच्या वतीने बाजारातील कृषी केंद्रावरून सदर बियाणांचे नमुने घेतले व तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले़ प्रयोगशाळेने उगवणक्षमता कमी असल्याचा अहवाल दिला़ त्यामुळे सदोष व उगवणक्षमता नसलेले बियाणे विक्री व वितरण करणाऱ्या मे. एशियन सीड्स प्रा़ लि़ कंपनी इंदोरचे संचालक आऱ एम़ पाटीदार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे़ 

तक्रारी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहनहजारो शेतकऱ्यांना बोगस बियाणाचा फटका बसल्याची शक्यता आहे़ त्यामुळे बोगस बियाण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन सपोनि. तपासिक अंमलदार पी.सी. बोधनापोड यांनी केले आहे़

जिल्ह्यात सातवा गुन्हायापूर्वी जिल्ह्यात सहा तक्रारी दाखल झाल्या होत्या. वसमत येथे दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर एकूण तक्रारींची संख्या सात झाली आहे. अजूनही काही कंपन्या कृषी विभागाच्या रडारवर आहेत. मात्र, त्यात इतर प्रक्रिया गुंतागुंतीच्या असल्याने वेळ जात आहे. मात्र, काही ठिकाणी कृषी विभाग वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी