शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 18:34 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एनटीसी भागातील कार्यालयात घुसून टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली.

हिंगोली : येथे बजाज अलायंझ कंपनीने शेतकऱ्यांकडून पीकविमा भरून घेतल्यानंतर शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. तसेच तक्रारींचीही दखल घेण्यास कार्यालय तयार नसल्याचा आरोप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कंपनीच्या एनटीसी भागातील कार्यालयात घुसून टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप २0१९ ला मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. त्यातच ऐन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना अवकाळी पावसाला सामोरे जावे लागला. यात सर्व्हेक्षण करण्यावरून प्रशासन व कंपनीत बराच वाद होता. त्यातही प्रत्यक्ष अर्ज करायचा की नाही करायचा, हेही वाद होता. यात अनेक शेतकऱ्यांची नावेच पीकविमा यादीत नाहीत. त्यामुळे या विविध प्रकारच्या तक्रारी घेवून शेतकरी या कंपनीच्या कार्यालयावर जात आहेत. मात्र त्यांना उडवा-उडवीची उत्तरे मिळत होती. यात वैतागलेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आज दुपारी बाराच्या सुमारास हे कार्यालय गाठले. मात्र तेथे कोणीच आले नव्हते. भ्रमणध्वनीवरून उडवा-उडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केला. आतमध्ये एक-दोन फायबर टेबल होते. त्याची तोडफोड केली. आतमध्ये दारुच्या रिकाम्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे दाखवत कंपनीने कार्यालय नव्हे, तर हा दारुचा अड्डा बनवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. 

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून पीकविमा भरून घेतला जात आहे. मात्र एकदाही विमा मिळाला नाही. यंदाही एवढे नुकसान होवूनही अद्याप छदाम मिळाला नाही. याकडे सरकारचेही लक्ष नसून कंपनीसोबत सरकारही या लुटीत सहभागी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी रावसाहेब बापूराव अडकीणे, नामदेव पतंगे, प्रकाश अडकिणे, सुभाष घाटगे, बापूराव गरड, डिगांबर गावंडे, नारायण कदम, किसन कदम, विशाल रोडगे आदी उपस्थित होते. या शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यातही यापूर्वीच निवेदन दिलेले होते. कार्यालयात कुणीच नसल्याने त्यांनी तोडफोड केली. ही घटना कळाल्यानंतर पोनि सय्यद हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र विमा कंपनीचे तक्रार करण्यास कुणीही आले नव्हते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीagitationआंदोलन