शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे, खताचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By विजय पाटील | Updated: July 26, 2023 16:44 IST

बोगस कीटकनाशक औषधी व खत बियाणे विक्रीच्या कारवाईसाठी दिला होता इशारा

गोरेगाव (जि. हिंगोली) : बोगस खते, बियाणांसह जैविक तथा रासायनिक कीटकनाशके व तणनाशकांच्या विक्रीवर आंदोलने करूनही कारवाई होत नाही. असा आरोप करीत शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी २६ जुलै रोजी दुपारी दीड वाजेदरम्यान विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

बाजारपेठेत विक्री केल्या जात असलेल्या बोगस खत, बियाणांसह जैविक तथा रासायनिक कीटकनाशक व तणनाशकावर कारवाई करुन तपासणीमध्ये बोगस आढलेल्या उत्पादनाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांच्याकडून  १७ जुलै रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. बोगस व कालबाह्य कीटक व तणनाशक औषधाच्या विक्रीतून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सदर बाबीकडे कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची बाब नमूद करीत तसेच बोगस औषधा विक्री करणाऱ्या कंपन्यांवर व कृषी केंद्रांवर कारवाई का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर कारवाई न झाल्यास २६ जुलै रोजी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.

आत्मदहनाचा इशारा देऊनही याबाबत कृषी विभागाकडून कुठलीच दखल घेण्यात आली. त्यामुळे  २६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास अमोल खिल्लारी यांच्याकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायलर करीत एका तासात मागणीची दखल न घेतल्यास दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कुठेही आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देत दुपारी दीड वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर तात्काळ खिल्लारी यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर हिंगोली येथे हलविण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले. 

कारवाईच्या टाळाटाळीमुळे भडका...बाजारपेठेत विक्री होणाऱ्या बोगस खत, बियाणांसह जैविक तथा रासायनिक तणनाशक व कीटक नाशकांवर कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघर्ष संघटना यांच्याकडून आंदोलने केली जात आहेत. मात्र सदर बाबीची गांभीर्यपूर्वक दखल न घेता कृषी विभागाकडून केवळ औषध नमुने तपासणीसाठी पत्रके काढीत वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे. जिल्हा कृषी विभागाचा सदर दप्तर दिरंगाई कारभार बघता स्वाभिमानचे नामदेव पतंगे हे मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा देत मुंबईत दाखल झाले आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी