शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बाजारात जास्त भाव असल्याने शेतकरी फिरकेनात अद्यापही नाफेडकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 14:03 IST

शेतकऱ्यांनी सोयाबीन व उडीदही नाफेडला विकले नाही

ठळक मुद्देनाफेड खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी जाचक अटी आहेत. जिनींग गरजेची, परप्रांतात कापसाची विक्री

- इलियास शेख 

कळमनुरी : नाफेड खरेदी केंद्राकडे अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. परंतु अद्यापपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकही शेतकरी फिरकला नसल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी.एम. जाधव यांनी दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मूग, उडीद व सोयाबीनसाठी ७०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केली. २०० ते २५० शेतकऱ्यांनी मुग विक्रीसाठी नाफेडकडे आणले. परंतु सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकाही शेतकऱ्याने नाफेडकडे आणले नसल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नाफेडमार्फत मुगाला ७ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल, उडीद ५ हजार ७०० रुपये, सोयाबीनला ३ हजार ७१० प्रतिक्वंटल हमीभाव आहे. आॅनलाईन नोंदणी करूनही शेतकरी नाफेड खरेदी केंद्राकडे फिरकले नाहीत.

यावर्षीही नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. येथील बाजार समितीत कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत मूग, उडीदाच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. तर डिसेंबर अखेरपर्यंत सोयाबीनच्या आॅनलाईन नोंदणीची मुदत असल्याचे सांगण्यात आले. बाजारात भाव जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरविली. माल विक्रीनंतरही रक्कम आॅनलाईन जमा होण्यासाठी विलंब लागत असल्याने आता शेतकरी अन्य बाजारात शेतमाल विकून पैसा मोकळा करत आहेत.

नाफेड खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी जाचक अटी आहेत. सातबारावर चालू हंगामातील पेरा नोंद केलेला असणे बंधनकारकआहे. मात्र महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बहुतांश सातबारांवर यावर्षीचा चालू हंगामातील पेरा नोंद केलेला असणे बंधनकारक आहे. मात्र महसूल प्रशासनाच्या उदासिनतेमुळे बहुतांश सातबारांवर यावर्षीचा पेरा मांडलेलाच नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. नाफेडकडे शेतमाल विक्री करूनही चुकारे मिळण्यास विलंब लागतो त्यामुळे शेतकरी नाफेड खरेदी केंद्राकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. तसेच आॅनलाईन नोंदणीही यावर्षी कमी प्रमाणात झाली आहे. यावर्षी पावसाळ्यात सुरूवातीला एकमहिना पाऊस पडला नाही. त्यामुळे मूग, उडदाचा पेरा घटलेला आहे. यामुळे आॅनलाईन नोंदणीही कमी प्रमाणात झाली. परतीच्या पावसामुळे तर सोयाबीनची अक्षरश: वाट लागली. हातातोंडाशी आलेले सोयाबीन हातचे गेले. त्यामुळे यंदा सोयाबीनचा उताराही कमालीचा घटला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील १४ ते १५ वर्षांपासून  कापूस खरेदी बंद आहे. 

जिनींग गरजेची, परप्रांतात कापसाची विक्रीतालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचा पेरा आहे. जिनींग प्रेसींग नसल्यामुळे येथे कापूस खरेदी होत नाही. तसेच या कापसावर तालुक्यात कोणतीही प्रक्रिया करण्याची सुविधा नाही. त्यामुळे तालुक्यातील कापूस विक्रीसाठी दरवर्षी परप्रांतात नेला जातो. यावर्षी परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांना म्हणावे तसे उत्पन्न झालेच नाही. यावर्षी कापसाचा उताराही घटला आहे. जिनींग प्रेसींगसाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. जिनींग प्रेसींग झाल्यास कापूस परप्रांतात विक्रीसाठी जाणार नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली