शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

बाजारात जास्त भाव असल्याने शेतकरी फिरकेनात अद्यापही नाफेडकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 14:03 IST

शेतकऱ्यांनी सोयाबीन व उडीदही नाफेडला विकले नाही

ठळक मुद्देनाफेड खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी जाचक अटी आहेत. जिनींग गरजेची, परप्रांतात कापसाची विक्री

- इलियास शेख 

कळमनुरी : नाफेड खरेदी केंद्राकडे अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. परंतु अद्यापपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकही शेतकरी फिरकला नसल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी.एम. जाधव यांनी दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मूग, उडीद व सोयाबीनसाठी ७०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणी केली. २०० ते २५० शेतकऱ्यांनी मुग विक्रीसाठी नाफेडकडे आणले. परंतु सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकाही शेतकऱ्याने नाफेडकडे आणले नसल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नाफेडमार्फत मुगाला ७ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल, उडीद ५ हजार ७०० रुपये, सोयाबीनला ३ हजार ७१० प्रतिक्वंटल हमीभाव आहे. आॅनलाईन नोंदणी करूनही शेतकरी नाफेड खरेदी केंद्राकडे फिरकले नाहीत.

यावर्षीही नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. येथील बाजार समितीत कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत मूग, उडीदाच्या विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. तर डिसेंबर अखेरपर्यंत सोयाबीनच्या आॅनलाईन नोंदणीची मुदत असल्याचे सांगण्यात आले. बाजारात भाव जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरविली. माल विक्रीनंतरही रक्कम आॅनलाईन जमा होण्यासाठी विलंब लागत असल्याने आता शेतकरी अन्य बाजारात शेतमाल विकून पैसा मोकळा करत आहेत.

नाफेड खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी जाचक अटी आहेत. सातबारावर चालू हंगामातील पेरा नोंद केलेला असणे बंधनकारकआहे. मात्र महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बहुतांश सातबारांवर यावर्षीचा चालू हंगामातील पेरा नोंद केलेला असणे बंधनकारक आहे. मात्र महसूल प्रशासनाच्या उदासिनतेमुळे बहुतांश सातबारांवर यावर्षीचा पेरा मांडलेलाच नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. नाफेडकडे शेतमाल विक्री करूनही चुकारे मिळण्यास विलंब लागतो त्यामुळे शेतकरी नाफेड खरेदी केंद्राकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. तसेच आॅनलाईन नोंदणीही यावर्षी कमी प्रमाणात झाली आहे. यावर्षी पावसाळ्यात सुरूवातीला एकमहिना पाऊस पडला नाही. त्यामुळे मूग, उडदाचा पेरा घटलेला आहे. यामुळे आॅनलाईन नोंदणीही कमी प्रमाणात झाली. परतीच्या पावसामुळे तर सोयाबीनची अक्षरश: वाट लागली. हातातोंडाशी आलेले सोयाबीन हातचे गेले. त्यामुळे यंदा सोयाबीनचा उताराही कमालीचा घटला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील १४ ते १५ वर्षांपासून  कापूस खरेदी बंद आहे. 

जिनींग गरजेची, परप्रांतात कापसाची विक्रीतालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचा पेरा आहे. जिनींग प्रेसींग नसल्यामुळे येथे कापूस खरेदी होत नाही. तसेच या कापसावर तालुक्यात कोणतीही प्रक्रिया करण्याची सुविधा नाही. त्यामुळे तालुक्यातील कापूस विक्रीसाठी दरवर्षी परप्रांतात नेला जातो. यावर्षी परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांना म्हणावे तसे उत्पन्न झालेच नाही. यावर्षी कापसाचा उताराही घटला आहे. जिनींग प्रेसींगसाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. जिनींग प्रेसींग झाल्यास कापूस परप्रांतात विक्रीसाठी जाणार नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली