शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी केंद्रबिंदू माना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:50 IST

शेतकरी हा अनेक अडचणीचा सामना करीत शेतातून उत्पन्न काढोे. त्याला प्रत्येक वेळी निराशाच येत असल्याने तो खचून जात आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी कृषीउत्पन्न बाजार समितीने केंद्र बिंदु मानुन कामे केली तर त्याचा विकासा बरोबरच देशाचाही विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष (बापू) देशमुख यांनी ‘सहकारी चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात केले.

ठळक मुद्देसहकारावर चर्चासत्र : मंत्री सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकरी हा अनेक अडचणीचा सामना करीत शेतातून उत्पन्न काढोे. त्याला प्रत्येक वेळी निराशाच येत असल्याने तो खचून जात आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी कृषीउत्पन्न बाजार समितीने केंद्र बिंदु मानुन कामे केली तर त्याचा विकासा बरोबरच देशाचाही विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष (बापू) देशमुख यांनी ‘सहकारी चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात केले.अध्यक्षस्थानी आ. तान्हाजी मुटकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सहकारी संस्था विभागीय सहनिबंधक राजेश सुरवसे, उज्ज्वला तांभाळे, माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने, माजी आ. कुंडलिक नागरे, गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवाजी जाधव, यशोदा कोरडे आदींची उपस्थिती होती. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत चर्चासत्राचे आयोजन केले होते. देशमुख म्हणाले, आप - आपल्या गावातील विविध कार्यकारी संस्थेचे सभासद झाले पाहिजे. एखादी कार्यकारी संस्था असेल तर दुसरी तयार करा. त्यातही जर तुम्हाला सभासद होऊ दिले जात नसेल तर मला पत्राद्वारे कळवा, असे शेतकºयांना सांगितले. तर महिलांनीही बचत गट पूर्णत: डोक्यातून काढून टाकत गावात एखादी संस्था सुरु केली तर खरोखरच अनेक महिलांना रोजगार मिळण्यास मदत होऊ शकते. तर सरकारच्या मदतीविना सव्वाआठशे संस्थांनी नवनवीन व्यवसाय सुरु केल्याचेही सांगितले. ग्रामीण भागातील संस्थांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देणार आहे. या संस्थेचे स्वत:चे भागभांडवल आणि राज्य सरकारची मदतीतून कर्ज उपलब्ध करुन देता येऊन ५० हजार तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्वांनीच एक पाऊल पुढे आले तर संपूर्ण महाराष्टÑ समृद्ध झाल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर जास्तीत-जास्त शेतकºयांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेऊन आपली अडचण दूर करावी. जेव्हा भाव चांगला वाटला तेव्हा शेतकरी शेतीमालाची विक्री करु शकतात. जिल्ह्यामध्ये गोडाऊनची कमी असेल तर सरकारी, खाजगी गोदाम भाडेतत्त्वावर घेऊन ही योजना उत्कृष्टपणे राबविण्यासाठी कृषी समितीने पुढाकार घेण्यास सांगितले. तर जलयुक्तच्या कामामुळे शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न बºयापैकी सुटलेला आहे. शेतीला पाणी देता यावे म्हणून सौर कृषीपंप शेतकºयांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. विशेष म्हणजे ७० वर्षांत जेवढी तूर खरेदी केली नसेल एवढी तूर फक्त एका वर्षात खरेदी केली आहे. त्यामुळे आता त्या तुरीची डाळ बनवून रास्त भाव दुकानावर फक्त ५५ रुपये किलोप्रमाणे लाभार्थ्यांना मिळणार आहे. तसेच उसाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावरही लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. तर हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ठराव माझ्यापर्यंत आल्यानंतर तोदेखील मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तर आ. मुटकुळे यांनी शेतकºयांची अजून चांगली सोय होण्यास कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २५ एकर जमिनीची मागणी केली.यावेळी इतरही मान्यवरांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात असलेल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. सूत्रसंचालन के. के. शिंदे यांनी तर प्रस्ताविक जिल्हाउपनिबंधक सुधिर मैत्रेवार, आभार डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी मानले.कर्जमाफी : खºया शेतकºयांनाच लाभकर्जमाफीवरुन आजही विरोधी पक्ष गोंधळ घालत आहेत. मात्र शेतकºयांनी भरलेल्या अर्जांची बारकाईने छाननी केली जात असून, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे अर्ज बाद करून खºयाच शेतकºयांना लाभ दिला जाणार आहे. येत्या मंगळवारपर्यंत त्या खºया शेतकºयांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत. मागच्यावेळी जसी १० ते ११ महिने कर्जमाफी चालली तशी आता नसून पारदर्शकतेसाठी आॅनलाईन अर्ज मागविल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितले. तब्बल ७७ लाख शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. यामुळे काही काळ शेतकºयांना त्रास झाला.