शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली

By विजय पाटील | Updated: November 24, 2023 14:50 IST

‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे

हिंगोली: मुंबईला जाऊन अवयव विक्री करण्याची तयारी सेनगाव तालुक्यातील गोेरेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. या संदर्भात शुक्रवारी स्वत:ला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेतला. शुक्रवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना होण्याचा निश्चय करण्यात आला.

यावर्षी गोरेगाव व परिसरात पावसाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमीच राहिले. खरीप हंगामात पावसाअभावी पिके करपून गेली. अनेकांनी उसनवारी करुन खरीप पिकांची पेरणी केली. परंतु उसनवारी फिटेल एवढे पैसे उत्पन्नातून निघाले नाही. यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमा व इतर शासकीय अनुदानासाठी शासनाकडे मागणी केली. परंतु शासनाने अजिबात लक्षही दिले नाही. त्यामुळे तर अवयव विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. आजमितीस शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा कसा चालवावा? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. २२ नोव्हेंबर रोजी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी ‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव निवेदनाद्वारे पाठविला आहे. 

२३ नोव्हेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी अंगाच्याभोवती अवयव विक्रीचे दरपत्रक लावून, हाती शेती कर्जाचे पासबुक घेत गोरेगाव येथील अपर तहसीलसमोर घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणीप्रति शासन गांभीर्य घेत नाही. याबाबत नाराजी व्यक्त करीत काही दिवसांत आम्ही थेट मुंबईला जाऊन आमची किडनी, लिव्हर, डोळे आदी अवयव विक्री करून मिळालेल्या पैशातून बँकेचे कर्ज परतफेड करण्याची तयारी यावेळी शेतकऱ्यांकडून दर्शविण्यात आली. 

शेतकऱ्यांनी वाहिली स्वत:लाच श्रद्धांजली...२४ नोव्हेंबर रोजी स्वत:हाच्या प्रतिमांना पुष्पहार घालीत श्रद्धांजली अर्पण करुण आज सायंकाळी मुंबई येथे रवाना होत तीथे उद्या किडनी, लिव्हर डोळे आदी अवयव विक्री करण्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी नामदेव पतंगे, गजानन कावरखे प्रकाश मगर, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी आदी उपस्थिती होती.

उद्या होणार मुंबईत दाखल...विविध अडचणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवणे शक्य नाही. त्यामुळे अवयव विक्रीचा निश्चय करण्यात आला उदया मुंबईत दाखल होऊन कर्ज परतफेडीसाठी शासनाला शरीरातील अवयव काढून देणार आहोत. तेंव्हा गावाकडे जीवंत परंत येवू की नाही. त्यामुळे तर गावामध्ये स्वतःला जिवंतपणीच श्रद्धांजली अर्पण करून मुंबई येथे जाण्याचा निश्चय करण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीEknath Shindeएकनाथ शिंदेAgriculture Sectorशेती क्षेत्र