शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली

By विजय पाटील | Updated: November 24, 2023 14:50 IST

‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे

हिंगोली: मुंबईला जाऊन अवयव विक्री करण्याची तयारी सेनगाव तालुक्यातील गोेरेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. या संदर्भात शुक्रवारी स्वत:ला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेतला. शुक्रवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना होण्याचा निश्चय करण्यात आला.

यावर्षी गोरेगाव व परिसरात पावसाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमीच राहिले. खरीप हंगामात पावसाअभावी पिके करपून गेली. अनेकांनी उसनवारी करुन खरीप पिकांची पेरणी केली. परंतु उसनवारी फिटेल एवढे पैसे उत्पन्नातून निघाले नाही. यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमा व इतर शासकीय अनुदानासाठी शासनाकडे मागणी केली. परंतु शासनाने अजिबात लक्षही दिले नाही. त्यामुळे तर अवयव विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. आजमितीस शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा कसा चालवावा? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. २२ नोव्हेंबर रोजी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी ‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव निवेदनाद्वारे पाठविला आहे. 

२३ नोव्हेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी अंगाच्याभोवती अवयव विक्रीचे दरपत्रक लावून, हाती शेती कर्जाचे पासबुक घेत गोरेगाव येथील अपर तहसीलसमोर घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणीप्रति शासन गांभीर्य घेत नाही. याबाबत नाराजी व्यक्त करीत काही दिवसांत आम्ही थेट मुंबईला जाऊन आमची किडनी, लिव्हर, डोळे आदी अवयव विक्री करून मिळालेल्या पैशातून बँकेचे कर्ज परतफेड करण्याची तयारी यावेळी शेतकऱ्यांकडून दर्शविण्यात आली. 

शेतकऱ्यांनी वाहिली स्वत:लाच श्रद्धांजली...२४ नोव्हेंबर रोजी स्वत:हाच्या प्रतिमांना पुष्पहार घालीत श्रद्धांजली अर्पण करुण आज सायंकाळी मुंबई येथे रवाना होत तीथे उद्या किडनी, लिव्हर डोळे आदी अवयव विक्री करण्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी नामदेव पतंगे, गजानन कावरखे प्रकाश मगर, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी आदी उपस्थिती होती.

उद्या होणार मुंबईत दाखल...विविध अडचणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवणे शक्य नाही. त्यामुळे अवयव विक्रीचा निश्चय करण्यात आला उदया मुंबईत दाखल होऊन कर्ज परतफेडीसाठी शासनाला शरीरातील अवयव काढून देणार आहोत. तेंव्हा गावाकडे जीवंत परंत येवू की नाही. त्यामुळे तर गावामध्ये स्वतःला जिवंतपणीच श्रद्धांजली अर्पण करून मुंबई येथे जाण्याचा निश्चय करण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीEknath Shindeएकनाथ शिंदेAgriculture Sectorशेती क्षेत्र