शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

कर्जफेडीसाठी अवयव विक्रीची तयारी, मुंबईला जाताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाहिली श्रद्धांजली

By विजय पाटील | Updated: November 24, 2023 14:50 IST

‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे

हिंगोली: मुंबईला जाऊन अवयव विक्री करण्याची तयारी सेनगाव तालुक्यातील गोेरेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. या संदर्भात शुक्रवारी स्वत:ला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेतला. शुक्रवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना होण्याचा निश्चय करण्यात आला.

यावर्षी गोरेगाव व परिसरात पावसाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमीच राहिले. खरीप हंगामात पावसाअभावी पिके करपून गेली. अनेकांनी उसनवारी करुन खरीप पिकांची पेरणी केली. परंतु उसनवारी फिटेल एवढे पैसे उत्पन्नातून निघाले नाही. यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमा व इतर शासकीय अनुदानासाठी शासनाकडे मागणी केली. परंतु शासनाने अजिबात लक्षही दिले नाही. त्यामुळे तर अवयव विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. आजमितीस शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा कसा चालवावा? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. २२ नोव्हेंबर रोजी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी ‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’असा अनोखा प्रस्ताव निवेदनाद्वारे पाठविला आहे. 

२३ नोव्हेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी अंगाच्याभोवती अवयव विक्रीचे दरपत्रक लावून, हाती शेती कर्जाचे पासबुक घेत गोरेगाव येथील अपर तहसीलसमोर घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणीप्रति शासन गांभीर्य घेत नाही. याबाबत नाराजी व्यक्त करीत काही दिवसांत आम्ही थेट मुंबईला जाऊन आमची किडनी, लिव्हर, डोळे आदी अवयव विक्री करून मिळालेल्या पैशातून बँकेचे कर्ज परतफेड करण्याची तयारी यावेळी शेतकऱ्यांकडून दर्शविण्यात आली. 

शेतकऱ्यांनी वाहिली स्वत:लाच श्रद्धांजली...२४ नोव्हेंबर रोजी स्वत:हाच्या प्रतिमांना पुष्पहार घालीत श्रद्धांजली अर्पण करुण आज सायंकाळी मुंबई येथे रवाना होत तीथे उद्या किडनी, लिव्हर डोळे आदी अवयव विक्री करण्याचा निश्चय करण्यात आला. यावेळी नामदेव पतंगे, गजानन कावरखे प्रकाश मगर, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी आदी उपस्थिती होती.

उद्या होणार मुंबईत दाखल...विविध अडचणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवणे शक्य नाही. त्यामुळे अवयव विक्रीचा निश्चय करण्यात आला उदया मुंबईत दाखल होऊन कर्ज परतफेडीसाठी शासनाला शरीरातील अवयव काढून देणार आहोत. तेंव्हा गावाकडे जीवंत परंत येवू की नाही. त्यामुळे तर गावामध्ये स्वतःला जिवंतपणीच श्रद्धांजली अर्पण करून मुंबई येथे जाण्याचा निश्चय करण्यात आला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीEknath Shindeएकनाथ शिंदेAgriculture Sectorशेती क्षेत्र