शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी

By विजय पाटील | Updated: May 27, 2024 14:03 IST

शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. परंतु अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले नाही.

हिंगोली: गत वर्षभरापासून जिल्ह्यातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत आहेत. कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत तर कधी कोरड्या दुष्काळाचा. मध्यंतरी शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. परंतु अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला असून रबी हंगामात पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा इशारा शासनाला दिला आहे.

गतवर्षीपासून शेतकरी या ना त्या कारणांमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान व अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या दारी चकरा माराव्या लागत आहेत. राज्य शासनाने हिंगोली जिल्हा दुष्काळसदृश्य असल्याचा शासन निर्णय घेतला. परंतु काही मोजक्या शेतकऱ्यांनाच शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळाले आहे. बाकी गरीब शेतकरी आजही शासनाच्या अनुदानापासून वंचितच आहेत. शासनाने विजबिलमध्ये सवलत, सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन, शाळा शुल्कमध्ये सवलत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापनातून मदत जाहीर करण्यात आली. मात्र शासन निर्णय होऊन सुद्धा सहा महिने उलटून गेले आहेत. अजूनही शेतकऱ्यांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. 

या अनुषंगाने जिल्ह्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी २७ मे रोजी ‘आमच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करावे अन्यथा आम्ही मोबाईल टॉवरवर बसून राहू’ असा निर्णय घेतला. शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत इतके निष्ठूर का झाले? हे मात्र कळायला मार्ग नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तरच मोबाईल टॉवरवरुन खाली उतरु नसता टॉवरवर बसून राहू, असा एकमुखी निर्णय ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

दिखावा म्हणून शेतकऱ्यांचा कळवळा दाखविला जातो....गत वर्षभरापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप, रबी व उन्हाळी हंगामातील एकाही शेतीमालाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे तर कोणते पीक घ्यावे हे शेतकऱ्यांना कळत नाही. पीक चांगले यावे म्हणून शेतकरी रात्रंदिवस शेतात राबराब राबत आहे. परंतु मोंढ्यात शेतीमाल नेला तर त्यातही अनेक त्रुट्या काढल्या जात आहेत. ‘शेतकरी जगला तर देश जगेल’ असे लोकांना दाखविण्यापुरते आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांचा ना लोकप्रतिनिधी, ना शासनाला कळवळा आहे. 

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे...रबी हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे. शेतकऱ्यांच्याजवळ आज पैसा नाही. बी-बियाणे, खते, औषध कोठून आणावे ? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन केले तर तात्पुरते आश्वासन दिले जातात. त्यानंतर मात्र त्या आश्वासनाची कोणीही पूर्तता करत नाही. शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या तरच आम्ही मोबाईल टॉवरवरुन खाली उतरु, नसता दिवसरात्र येथेच बसून राहू, असा पवित्रा ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. आज पहिला दिवस आहे. अजून महिना लागला तरी दुष्काळी व अतिवृष्टीचे अनुदान सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत पडणार नाही. तोपर्यंत बसून राहणार असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली