शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकरी महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 19:29 IST

शिक्षणासह कुटुंबाचा वाढता खर्च आणि घटणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

वसमत : तालुक्यातील बाभूळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी महिला द्रोपदाबाई उर्फ ध्रुपतीबाई मगर (४०) या महिलेने सततच्या नापिकीला व मुलीच्या शिक्षणासह भविष्यातील लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाच्या विवंचनेतून मंगळवारी ( दि. १८ ) सकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

बाभूळगाव माहेर असलेल्या द्रोपदाबाई या एका पायाने अपंग होत्या. त्यांचा विवाह गावातीलच गोपीनाथ मगर यांच्याशी झाल्याने तेच सासरही आहे. अवघी साडेतीन एकर कोरडवाहू शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पती गोपीनाथ फारसे काम करीत नाहीत. त्यांना एक मुलगा सचिन (वय १९ वर्षे) असून तोही मजुरीच करतो. मुलगी विद्या हिने दहावीत ९० टक्के गुण मिळविले असून सध्या ती बारावी विज्ञान शिक्षण घेण्यासहीत वैद्यकीय परीक्षेची तयारी करीत आहे. कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे यासह विद्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा केवळ कोरडवाहू शेती आणि सचिनची मजुरी यातूनच करावा लागतो. परंतु मागील तीन वर्षांपासून शेतीचे उत्पन्न प्रचंड घटले असून कोरडवाहू शेती असल्याने सोयाबीन व ज्वारीशिवाय इतर कोणतेच पीक घेता येत नाही. मुलगी अभ्यासात हुशार असून वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न असल्याने तिच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च लागत होता. यानंतर तिच्या लग्नासाठी खूप खर्च येणार याची चिंता होती. त्यामुळे शिक्षणासह कुटुंबाचा वाढता खर्च आणि घटणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी महिलेने स्वत:च्या घरातच सकाळी पाचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी येथील ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

यापूर्वी दोन शेतकरी महिलांची आत्महत्यायापूर्वी २0१८ मध्ये २ महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद आहे. हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील कलावतीबाई पांडुरंग काळबांडे यांनी २३ फेब्रुवारीला विहिरीत उडी घेतली होती. तर याच तालुक्यातील केसापूरच्या राधाबाई किसन खंदारे यांनी ३0 मार्चला विहिरीत उडी घेतली होती. या दोघींनाही शासकीय मदत मिळाली होती.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याHingoliहिंगोलीFamilyपरिवार