शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकरी महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 19:29 IST

शिक्षणासह कुटुंबाचा वाढता खर्च आणि घटणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

वसमत : तालुक्यातील बाभूळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी महिला द्रोपदाबाई उर्फ ध्रुपतीबाई मगर (४०) या महिलेने सततच्या नापिकीला व मुलीच्या शिक्षणासह भविष्यातील लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाच्या विवंचनेतून मंगळवारी ( दि. १८ ) सकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

बाभूळगाव माहेर असलेल्या द्रोपदाबाई या एका पायाने अपंग होत्या. त्यांचा विवाह गावातीलच गोपीनाथ मगर यांच्याशी झाल्याने तेच सासरही आहे. अवघी साडेतीन एकर कोरडवाहू शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पती गोपीनाथ फारसे काम करीत नाहीत. त्यांना एक मुलगा सचिन (वय १९ वर्षे) असून तोही मजुरीच करतो. मुलगी विद्या हिने दहावीत ९० टक्के गुण मिळविले असून सध्या ती बारावी विज्ञान शिक्षण घेण्यासहीत वैद्यकीय परीक्षेची तयारी करीत आहे. कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे यासह विद्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा केवळ कोरडवाहू शेती आणि सचिनची मजुरी यातूनच करावा लागतो. परंतु मागील तीन वर्षांपासून शेतीचे उत्पन्न प्रचंड घटले असून कोरडवाहू शेती असल्याने सोयाबीन व ज्वारीशिवाय इतर कोणतेच पीक घेता येत नाही. मुलगी अभ्यासात हुशार असून वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न असल्याने तिच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च लागत होता. यानंतर तिच्या लग्नासाठी खूप खर्च येणार याची चिंता होती. त्यामुळे शिक्षणासह कुटुंबाचा वाढता खर्च आणि घटणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी महिलेने स्वत:च्या घरातच सकाळी पाचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी येथील ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

यापूर्वी दोन शेतकरी महिलांची आत्महत्यायापूर्वी २0१८ मध्ये २ महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद आहे. हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील कलावतीबाई पांडुरंग काळबांडे यांनी २३ फेब्रुवारीला विहिरीत उडी घेतली होती. तर याच तालुक्यातील केसापूरच्या राधाबाई किसन खंदारे यांनी ३0 मार्चला विहिरीत उडी घेतली होती. या दोघींनाही शासकीय मदत मिळाली होती.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याHingoliहिंगोलीFamilyपरिवार