सात ते आठ दिवसांत बंद करता येते खाते
एखाद्या खातेदाराच्या नावे फेसबुक अथवा इतर सोशल माध्यमांवर बनावट अकाउंट तयार करून त्याचा गैरवापर सुरू झाला, तर संबधित कंपनीला ई-मेल अथवा त्याच्या कम्लेंट सिस्टीममध्ये मेसेज पाठवून माहिती देता येते. त्यानंतर कंपनी संबंधित अकाउंट तत्काळ बंद करते. अथवा सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस त्यांच्या सायबर पोर्टलच्या माध्यमातून संबंधित कंपनीला रिक्वेस्ट पाठवून असे अकाउंट बंद करण्याची सूचना दिली जाते. तक्रार केल्यानंतर अकाउंट बंद होण्यास सात ते आठ दिवसांचा वेळ लागतो.
कोरोनाकाळात वाढल्या तक्रारी
मागील दीड वर्षापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरामध्ये थांबत होते. परिणामी सोशल मीडियाचा वापर वाढला. सायबर गुन्हेगारांनी याच संधीचा फायदा घेत फसवणूक करण्याचे विविध फंडे शोधून काढले. या काळात फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत.
पोलिसांसाठी वेगळे पोर्टल
दिवसेंदिवस सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याने सायबर पोलीसही अत्याधुनिक साधनांचा वापर करीत आहेत. सोशल मीडियावरील बनावट अकाउंट बंद करण्यासाठी पोलिसांकडे स्वतंत्र पोर्टल असते. त्या माध्यमातून तक्रार पुढे पाठवून कार्यवाही केली जाते.
सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये, फसवणूक झाल्यास स्थानिक पोलीस ठाणे अथवा सायबर सेलकडे तक्रार करावी.
-उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली
सायबर सेलकडे आलेल्या विविध फसवणुकीच्या तक्रारी
२०२० - १६
२०२१ - ०३