शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

खळबळजनक! आंबाचोंडी रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: July 18, 2024 19:02 IST

गावातील तरुणांतील वादाचे रूपांतर नंतर एकास चाकू भोसकण्यापर्यंत गेले

- इब्राहीम जहागिरदारकुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील आंबाचोंडी येथील रेल्वे स्टेशनजवळ १८ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाच्या पोटात चाकूचे वार केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या तरुणास अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविले. परंतु गंभीर जखमी असलेल्या तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

आंबाचोंडी येथे किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव सतीश सुरेश भोसले (वय २८) आहे. चोंडी रेल्वे स्टेशन जवळ भर दिवसा सदर तरुणासोबत गावातील काही तरुणांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर चाकू भोसकण्यापर्यंत गेले असल्याचे सांगण्यात येते. या खुनाच्या घटनेमुळे कुरुंदा व परिसरात खळबळ उडाली असून, नेमका कोणत्या कारणातून खून केला हे अजूनही स्पष्ट झाले नाही. 

घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, फौजदार आडे, श्रीधर वाघमारे, जमादार बालाजी जोगदंड, इमरान सिद्धीकी आदींनी भेट दिली. या घटनेसंदर्भात पोलिस तपास करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली