शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

खळबळजनक! आंबाचोंडी रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तरुणाचा चाकूने भोसकून खून

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: July 18, 2024 19:02 IST

गावातील तरुणांतील वादाचे रूपांतर नंतर एकास चाकू भोसकण्यापर्यंत गेले

- इब्राहीम जहागिरदारकुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील आंबाचोंडी येथील रेल्वे स्टेशनजवळ १८ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाच्या पोटात चाकूचे वार केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या तरुणास अधिक उपचारासाठी नांदेड येथे पाठविले. परंतु गंभीर जखमी असलेल्या तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

आंबाचोंडी येथे किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव सतीश सुरेश भोसले (वय २८) आहे. चोंडी रेल्वे स्टेशन जवळ भर दिवसा सदर तरुणासोबत गावातील काही तरुणांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर चाकू भोसकण्यापर्यंत गेले असल्याचे सांगण्यात येते. या खुनाच्या घटनेमुळे कुरुंदा व परिसरात खळबळ उडाली असून, नेमका कोणत्या कारणातून खून केला हे अजूनही स्पष्ट झाले नाही. 

घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, फौजदार आडे, श्रीधर वाघमारे, जमादार बालाजी जोगदंड, इमरान सिद्धीकी आदींनी भेट दिली. या घटनेसंदर्भात पोलिस तपास करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली