शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

सीबीनॅटद्वारे १००३ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:42 IST

जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.पूर्वी संशयित क्षयरोग रूग्णांची थुंकी तपासण्यासाठी रूग्णांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत असे. त्यामुळे रूग्णाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागे. शिवाय उपचार सुरू होण्यासही वेळ लागे. मात्र आता सीबनेटद्वारे दोन तासांतच क्षयरोगाचे निदान होत आहे. त्यामुळे रूग्णांवरत तत्काळ उपचार करण्यास मदत होत आहे. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. जिल्हा रूग्णालयातील सीबीनेट यंत्राद्वारे क्षयरोगाचे लवकर निदान होण्यास मदत होत आहे. त्यामुळे रूग्णांना तात्काळ व वेळेत उपचार मिळत आहेत. अत्याधुनिक यंत्राद्वारे वर्षभरात १००३ संशयित क्षयरोग रूग्णांची यंत्राद्वारे तपासणी केली. पूर्वी दुर्धर समजला जाणारा, क्षयरोग पूर्णत: बरा होणारा आजार आहे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रामार्फत क्षयरोगाचा प्रसार वाढू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. क्षयग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातआहे.ड्रग रेजीस्टंट १८ क्षयरूग्ण आढळून आले आहेत. हे रूग्ण क्षयरोगाच्या नेहमीच्या उपचार पद्धतीस प्रतिसाद देत नाहीत. त्यासाठी अशा रूग्णांना जास्त कालावधीचा उपचार द्यावा लागतो असे डॉक्टरांनी सांगितले. क्षयग्रस्त रूग्णांना पूर्वी आठड्यातून ३ वेळेस डोस द्यावा लागे. परंतु आता हा डोस डॉक्टरांच्या सल्यानुसार दरदिवशी दिला जात आहे. नियमित औषधांचे सेवन आरोग्याची काळजी घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेला डोस वेळेत घेणे महत्वाचे आहे. असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.९८५ रूग्णांचा शोध उपचार पद्धती४शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग रूग्णांचा आरोग्य यंत्रनेद्वारे शोध घेतला जातो. त्यांना दिलेला डोस वेळेवर घेतला जातो किंवा नाही, तसेच औषोधोपचार पुरवठा केला जातो. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत गतवर्षी ९८५ क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.