शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सीबीनॅटद्वारे १००३ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:42 IST

जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.पूर्वी संशयित क्षयरोग रूग्णांची थुंकी तपासण्यासाठी रूग्णांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत असे. त्यामुळे रूग्णाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागे. शिवाय उपचार सुरू होण्यासही वेळ लागे. मात्र आता सीबनेटद्वारे दोन तासांतच क्षयरोगाचे निदान होत आहे. त्यामुळे रूग्णांवरत तत्काळ उपचार करण्यास मदत होत आहे. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. जिल्हा रूग्णालयातील सीबीनेट यंत्राद्वारे क्षयरोगाचे लवकर निदान होण्यास मदत होत आहे. त्यामुळे रूग्णांना तात्काळ व वेळेत उपचार मिळत आहेत. अत्याधुनिक यंत्राद्वारे वर्षभरात १००३ संशयित क्षयरोग रूग्णांची यंत्राद्वारे तपासणी केली. पूर्वी दुर्धर समजला जाणारा, क्षयरोग पूर्णत: बरा होणारा आजार आहे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रामार्फत क्षयरोगाचा प्रसार वाढू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. क्षयग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातआहे.ड्रग रेजीस्टंट १८ क्षयरूग्ण आढळून आले आहेत. हे रूग्ण क्षयरोगाच्या नेहमीच्या उपचार पद्धतीस प्रतिसाद देत नाहीत. त्यासाठी अशा रूग्णांना जास्त कालावधीचा उपचार द्यावा लागतो असे डॉक्टरांनी सांगितले. क्षयग्रस्त रूग्णांना पूर्वी आठड्यातून ३ वेळेस डोस द्यावा लागे. परंतु आता हा डोस डॉक्टरांच्या सल्यानुसार दरदिवशी दिला जात आहे. नियमित औषधांचे सेवन आरोग्याची काळजी घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेला डोस वेळेत घेणे महत्वाचे आहे. असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.९८५ रूग्णांचा शोध उपचार पद्धती४शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग रूग्णांचा आरोग्य यंत्रनेद्वारे शोध घेतला जातो. त्यांना दिलेला डोस वेळेवर घेतला जातो किंवा नाही, तसेच औषोधोपचार पुरवठा केला जातो. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत गतवर्षी ९८५ क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.