शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सीबीनॅटद्वारे १००३ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:42 IST

जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ वर्षात जिल्हा रूग्णालयातील सीबीनेटद्वारे १००३ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात २०३ जणांना क्षयरोग असल्याचे आढळुन आले.पूर्वी संशयित क्षयरोग रूग्णांची थुंकी तपासण्यासाठी रूग्णांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत असे. त्यामुळे रूग्णाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागे. शिवाय उपचार सुरू होण्यासही वेळ लागे. मात्र आता सीबनेटद्वारे दोन तासांतच क्षयरोगाचे निदान होत आहे. त्यामुळे रूग्णांवरत तत्काळ उपचार करण्यास मदत होत आहे. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. जिल्हा रूग्णालयातील सीबीनेट यंत्राद्वारे क्षयरोगाचे लवकर निदान होण्यास मदत होत आहे. त्यामुळे रूग्णांना तात्काळ व वेळेत उपचार मिळत आहेत. अत्याधुनिक यंत्राद्वारे वर्षभरात १००३ संशयित क्षयरोग रूग्णांची यंत्राद्वारे तपासणी केली. पूर्वी दुर्धर समजला जाणारा, क्षयरोग पूर्णत: बरा होणारा आजार आहे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रामार्फत क्षयरोगाचा प्रसार वाढू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. क्षयग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातआहे.ड्रग रेजीस्टंट १८ क्षयरूग्ण आढळून आले आहेत. हे रूग्ण क्षयरोगाच्या नेहमीच्या उपचार पद्धतीस प्रतिसाद देत नाहीत. त्यासाठी अशा रूग्णांना जास्त कालावधीचा उपचार द्यावा लागतो असे डॉक्टरांनी सांगितले. क्षयग्रस्त रूग्णांना पूर्वी आठड्यातून ३ वेळेस डोस द्यावा लागे. परंतु आता हा डोस डॉक्टरांच्या सल्यानुसार दरदिवशी दिला जात आहे. नियमित औषधांचे सेवन आरोग्याची काळजी घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेला डोस वेळेत घेणे महत्वाचे आहे. असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.९८५ रूग्णांचा शोध उपचार पद्धती४शहरासह ग्रामीण भागात क्षयरोग रूग्णांचा आरोग्य यंत्रनेद्वारे शोध घेतला जातो. त्यांना दिलेला डोस वेळेवर घेतला जातो किंवा नाही, तसेच औषोधोपचार पुरवठा केला जातो. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत गतवर्षी ९८५ क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.