शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साहेब ! वयोमर्यादा संपून जातेय तरीही प्रश्न मार्गी लागेना; अनुकंपाधारकांचे हिंगोलीत उपोषण

By रमेश वाबळे | Updated: February 12, 2024 18:31 IST

आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नसल्याचे अनुकंपाधारकांचे म्हणणे आहे.

हिंगोली : जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचा अनुशेष तातडीने भरावा, शैक्षणिक अर्हतेनुसार तत्काळ शासन सेवेत सामावून घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी अनुकंपाधारकांनी १२ फेब्रुवारीपासून जि.प.कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

जिल्ह्यातील अनुकंपाधारक मागील अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असून, काहीजण वयोमर्यादेतून बाद होण्याच्या मार्गावर आहेत. त्याकरिता अनुकंपाधारकांनी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली; परंतु आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नसल्याचे अनुकंपाधारकांचे म्हणणे आहे. सन २०२२ पासून जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे अनुकंपाधारक नोकरीपासून वंचित आहेत. या अनुकंपाधारकांना शैक्षणिक अर्हतेनुसार तत्काळ शासन सेवेत सामावून घ्यावे. तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी तरतूद करावी, या मागणीसाठी जिल्हा अनुकंपाधारक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे.

यासंदर्भात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. उपोषणात संदीप खंदारे, विठ्ठल साबळे, अनिकेत सोनटक्के, पुनित पट्टेबहादूर, संदीप कांबळे, जगदीश मोरे, ऋषिकेश कुंदर्गे, अविनाश कांबळे, संजय राठोड, अमोल चारठाणकर, सिद्धार्थ गायकवाड, शेख परवेज, निखिल बर्गे, अमोल गिरी, सचिन गव्हाणे, आशिष वाळके, अरुण भास्करे, वैभव देशमुख, राजू हनवते, श्रीकांत जगताप, ऋषिकेश गायकवाड, शासनजीत कदम आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलन