शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
6
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
7
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
8
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
9
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
10
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
11
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
12
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
13
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
14
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
15
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
16
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
17
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
18
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
19
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
20
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६- ९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ६ - ९ संधीचे बंधन घालण्यात आले आहेत. यासंबंधीचा निर्णय ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ६ - ९ संधीचे बंधन घालण्यात आले आहेत. यासंबंधीचा निर्णय ३० डिसेंबर रोजी घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या संधी मर्यादित करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. एमपीएससी आयोगाने अचानक हा निर्णय घेतल्याने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमधून हा निर्णय चुकीचा असल्याचे बोलल्या जात आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ संधी तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना ९ संधी असा भेद का? असे बाेलले जात आहे. सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची मागणीही विद्यार्थ्यांतून होत आहे.

परीक्षा वेळेत होत नाहीत

एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयोगाकडून वेळेच्या वेळी परीक्षा होत नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा जाहिरातीच्या प्रतीक्षेत असतात. यामुळे आयोगाच्या वतीने वेळेत जाहिराती काढून परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच मंत्र्याकडून यावर्षी परीक्षा घेण्याचे आश्वासने दिली जातात ,पण ते वर्ष अजूनही आले नाही.

संदीप हराळ, हिंगोली

वेळेवर निकालही लागत नाहीत

एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा वेळेत होत नाहीत. तसेच त्यांचे निकालही वेळेवर लागत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. त्यातच आयोगाच्या वतीने कमाल संधीचा निर्णय घेण्यात आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आकाश भगत, हिंगोली

या निर्णयामुळे अनेकांमध्ये गोंधळाची स्थिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतल्यामुळे परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या परीक्षेत भाग घेतल्यास एक पेपरला उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जात असल्याने अनेकांमधून नाराजी व्यक्त हाेत असल्याने हा निर्णय याेग्य वेळी घेणे गरजेचा हाेता.

कैलास बेंद्रे, हिंगोली

उमेदवारांना एकच न्याय द्यावा

एमपीएससी आयोगाने ६-९ संधीचे बंधन घालून दिल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या आदेशातील किचकट निर्णयामुळे अनेकांना संधी घालवावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण येत असल्याने सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची गरज आहे.

प्रदीप कावरखे, गोरेगाव