शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६- ९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ६ - ९ संधीचे बंधन घालण्यात आले आहेत. यासंबंधीचा निर्णय ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ६ - ९ संधीचे बंधन घालण्यात आले आहेत. यासंबंधीचा निर्णय ३० डिसेंबर रोजी घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या संधी मर्यादित करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. एमपीएससी आयोगाने अचानक हा निर्णय घेतल्याने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमधून हा निर्णय चुकीचा असल्याचे बोलल्या जात आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ संधी तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना ९ संधी असा भेद का? असे बाेलले जात आहे. सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची मागणीही विद्यार्थ्यांतून होत आहे.

परीक्षा वेळेत होत नाहीत

एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयोगाकडून वेळेच्या वेळी परीक्षा होत नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा जाहिरातीच्या प्रतीक्षेत असतात. यामुळे आयोगाच्या वतीने वेळेत जाहिराती काढून परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच मंत्र्याकडून यावर्षी परीक्षा घेण्याचे आश्वासने दिली जातात ,पण ते वर्ष अजूनही आले नाही.

संदीप हराळ, हिंगोली

वेळेवर निकालही लागत नाहीत

एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा वेळेत होत नाहीत. तसेच त्यांचे निकालही वेळेवर लागत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. त्यातच आयोगाच्या वतीने कमाल संधीचा निर्णय घेण्यात आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आकाश भगत, हिंगोली

या निर्णयामुळे अनेकांमध्ये गोंधळाची स्थिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतल्यामुळे परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या परीक्षेत भाग घेतल्यास एक पेपरला उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जात असल्याने अनेकांमधून नाराजी व्यक्त हाेत असल्याने हा निर्णय याेग्य वेळी घेणे गरजेचा हाेता.

कैलास बेंद्रे, हिंगोली

उमेदवारांना एकच न्याय द्यावा

एमपीएससी आयोगाने ६-९ संधीचे बंधन घालून दिल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या आदेशातील किचकट निर्णयामुळे अनेकांना संधी घालवावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण येत असल्याने सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची गरज आहे.

प्रदीप कावरखे, गोरेगाव