शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६- ९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ६ - ९ संधीचे बंधन घालण्यात आले आहेत. यासंबंधीचा निर्णय ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ६ - ९ संधीचे बंधन घालण्यात आले आहेत. यासंबंधीचा निर्णय ३० डिसेंबर रोजी घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या संधी मर्यादित करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. एमपीएससी आयोगाने अचानक हा निर्णय घेतल्याने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमधून हा निर्णय चुकीचा असल्याचे बोलल्या जात आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ संधी तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना ९ संधी असा भेद का? असे बाेलले जात आहे. सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची मागणीही विद्यार्थ्यांतून होत आहे.

परीक्षा वेळेत होत नाहीत

एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयोगाकडून वेळेच्या वेळी परीक्षा होत नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा जाहिरातीच्या प्रतीक्षेत असतात. यामुळे आयोगाच्या वतीने वेळेत जाहिराती काढून परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच मंत्र्याकडून यावर्षी परीक्षा घेण्याचे आश्वासने दिली जातात ,पण ते वर्ष अजूनही आले नाही.

संदीप हराळ, हिंगोली

वेळेवर निकालही लागत नाहीत

एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा वेळेत होत नाहीत. तसेच त्यांचे निकालही वेळेवर लागत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. त्यातच आयोगाच्या वतीने कमाल संधीचा निर्णय घेण्यात आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आकाश भगत, हिंगोली

या निर्णयामुळे अनेकांमध्ये गोंधळाची स्थिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतल्यामुळे परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या परीक्षेत भाग घेतल्यास एक पेपरला उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जात असल्याने अनेकांमधून नाराजी व्यक्त हाेत असल्याने हा निर्णय याेग्य वेळी घेणे गरजेचा हाेता.

कैलास बेंद्रे, हिंगोली

उमेदवारांना एकच न्याय द्यावा

एमपीएससी आयोगाने ६-९ संधीचे बंधन घालून दिल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या आदेशातील किचकट निर्णयामुळे अनेकांना संधी घालवावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण येत असल्याने सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची गरज आहे.

प्रदीप कावरखे, गोरेगाव