शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा; हिंगोलीत मुस्लीम समाजाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:30 IST

 राज्यातील मुस्लीम समाजबांधवांना उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी २०१४ मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून आरक्षण देण्याची मागणी मुस्लीम समाजाकडून करण्यात आली.

हिंगोली :  राज्यातील मुस्लीम समाजबांधवांना उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी २०१४ मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून आरक्षण देण्याची मागणी मुस्लीम समाजाकडून करण्यात आली. या संदर्भात मुस्लीम समाज बांधवांनी आज जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. 

आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील मुस्लीम समाजबांधवांचा जनसमुदाय मोठ्या संख्येने शुक्रवारी जिल्हाकचेरी समोर जमला होता. शासनाने २०१४ मध्ये मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहिर केले होते. यासंबधी उच्च न्यायालय खंडपीठ येथे जनहित याचिका दाखल केली असता, न्यायालयाने मुस्लीम समाजाला दिलेले ५ टक्के आरक्षण शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी गरजेचे असल्याचे मान्य केले. तसेच न्यायालयाने यासंदर्भात सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या जगन्नाथ मिश्रा आयोग, महेमुदुर रहेमान आयोग, व न्यायमुर्ती राजेंद्र सच्चर यांच्या शिफारशीनुसार मुस्लीम समाज आजघडीला मागासवर्गीयांच्याही पलीकडे गेला असल्यामुळे त्यांना जीवन जगण्यासाठी शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक आरक्षण अत्यंत गरजेचे असल्याचे मत उच्च न्यायालयने दिलेले आहे. 

मागील सरकारने मुस्लीम सरकारने दिलेल्या आरक्षणाचे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्यात तरतूद करून अंमलबजावणी करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. जो हा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबितच आहे. सध्या शासन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अधिवेशन बोलावत आहे. त्यामध्ये मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत चर्चासत्रही होत आहे. त्यामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्राने नियुक्त केलेल्या आयोगाच्या शिफारशीनुसार मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणाचे परिपत्रक काढून अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 

तसेच मुस्लीम समाजाच्या आरक्षणबाबत विचार करून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या चर्चासत्रात चर्चा करून कायद्यात रूपांतर करावे. तसेच मराठा, धनगर समाजासोबतच मुस्लीम समाजालाही आरक्षण जाहिर करावे. अन्यथा आरक्षणासाठी मुस्लीम समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचा इशारा मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. निवेदनावर शेख निहाल, जावेद राज, शेख अतिखूर रहेमान, शेख शकील, इरफान पठाण, शेख हनीफ तांबोली, शे. आरेफ यांच्यास मुस्लीम समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वसमतमध्येही दिले निवेदन वसमत येथे मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन ३ आॅगस्ट रोजी सादर करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम समाजबांधव यावेळी उपस्थित होते. निवेदनावर शेख मोबीन, नदीम सौदागर, युनूस उस्मान, मोईन कादरी, शे. सत्तार यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Muslimमुस्लीमreservationआरक्षणagitationआंदोलनHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली