शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बस बंद झाल्याने शिक्षण थांबले; महिलांनी रडत-रडत मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 19:38 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा गावाची बस गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडली आहे.

ठळक मुद्देगावातील मुले पायी तीस किमी चालत जात आहेत.पोटचा गोळा गेल्याने हंबरडा फोडला...

हिंगोली : औंढा तालुक्यातील बेरुळा गावात बससह कोणतीच दळणवळणाची सुविधा मिळत नसून महावितरणच्या तारांचा अडसर गावातील मुलांच्या शिक्षणातील अडथळा ठरत आहे. या गावातील महिलांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आपली व्यथा मांडताना अनेक महिलांना रडू कोसळले.  

औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा गावाची बस गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडली आहे. ही बस बंद होण्यामागे महावितरणची तार रस्त्यावरून गेल्याचे कारण एसटी महामंडळाकडून सांगितले जात आहे. हिंगोली-औंढा-साळना-अनखळी-पोटा-पेरजाबाद- नांदखेडा-बेरूळा अशा मार्गे ही बस धावत होती, असे सांगण्यात आले. तर गावातील मुले पोटा अनखळी येथे शाळेत जातात. त्यांना या बसशिवाय कोणताच पर्याय नाही. खाजगी वाहनेही जात नाहीत. बाहेरून छोटे वाहन मागविल्यास त्याचा मोठा खर्च येतो. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत. गोरगरिबांना असे वाहन भाड्याने घेणे परवडत नसल्याने आजारी रुग्णांनाही पायी घेवून जावे लागत आहे. तर इतर कोणताच विभाग या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर पन्नासच्या आसपास महिला धडकल्या. त्यांनी आपली समस्या अगदी पोटतिडकीने मांडली. आता महावितरणसह सर्वच विभाग याकडे किती गांभिर्याने पाहतात, हे लवकरच कळणार आहे.

स्वराज्य महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वैजयंता सुर्वे म्हणाल्या, आमच्या गावातील मुले पायी तीस किमी चालत जात आहेत. यामुळे मुले आजार पडत आहेत. आजारी पडल्यावरही या मुलांना नेण्यासाठी मोठी अडचण होते. लहान वाहने भाड्याने करून जाण्याशिवाय जाता येत नाही. १३ सप्टेंबर, ३0 सप्टेंबरलाही यापूर्वी अर्ज दिला. अनेक लोकप्रतिनिधींनाही भेटलो. मात्र कुणीच काही केले नाही. आता समस्या सुटली नाही तर आता येथे बेमुदत आंदोलन करू. जिल्हा कचेरीसमोर ठाण मांडून बसू. आमच्या गावाला भेट देऊन पाहिल्यावर प्रशासनाच्या लक्षात येईल की, आमची समस्या काय आहे? मतदान मागण्यासाठी मात्र आमच्या गावात सगळ्याच पक्षाच्या गाड्या आल्या होत्या. निवडून आल्यावर आता कोणीच फिरकायला तयार नाही. सुमन चव्हाण यांनी सांगितले की, आमच्या गावात बस येत नाही. मुलांचे शिक्षण बुडत आहे. पायी जाण्यास मुले कंटाळत आहेत. मुलींनाही पायी जाण्याची वेळ येत आहे.

पोटचा गोळा गेल्याने हंबरडा फोडला...बस चालू नसल्याने माझी लेक वारली तर मला तिला त्यापूर्वीही भेटायला जाता आले नाही अन् नंतरही तिला पाहणे शक्य झाले नसल्याचे सांगून एका महिलेने हंबरडा फोडला. त्यानंतर तेथील प्रत्येकाचे मन हेलावून गेले. इतरही महिलांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. एसटी महामंडळाकडेही या महिलांनी अनेक निवेदने दिली. मात्र रस्त्यावरील महावितरणच्या तारा हटत नाहीत, तोपर्यंत बस सुरू करणे शक्य नसल्याचे महामंडळाचे अधिकारी सांगत आहेत. या तारांमुळे काही अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार? अशी विचारणा केली जात आहे. महावितरणलाही या तारा बाजूला सारण्यासाठी १३ सप्टेंबर २0१९ लाच निवेदन दिले होते. मात्र त्यांनी अद्याप कोणतीच कार्यवाही केली नाही. याबाबत महावितरणकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्याचे महिलांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र