शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्यांच्या त्रासामुळे महिलेने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:39 IST

तालुक्यातील कनेरगाव येथील एका ३५ वर्षीय महिलेने शेजाºयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील कनेरगाव येथील एका ३५ वर्षीय महिलेने शेजाºयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील कालंदा यादवराव खराटे (३५) या विवाहित महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी दुपारी हा प्रकार समोर आला. घटनास्थळावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंद खडके, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, जमादार बडे, कोकरे आदींनी भेट देऊन पंचनामा केला. मयताजवळ चिठ्ठ्या सापडल्याने हे प्रकरण वेगळे असल्याचे समोर आले होते. त्यात शेजारील व्यक्तीच्या नेहमीच्या त्रासाला व भांडणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद असल्याचे समोर आल्याने आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.या प्रकरणात रात्री उशिरा मयताचे पती यादव बबनराव खराटे यांच्या तक्रारीवरून अर्चना सपकाळ, सुनीता बालाजी जगताप, वंदना भोसले, बालाजी जगताप या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मयतास या सर्वांनी ‘तू आमच्या लई चुगल्या लावतीस’, असे म्हणून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे पत्नीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी