शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

पालकमंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांचे गा-हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:26 IST

दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी निघालेले पालकमंत्री दिलीप कांबळे हे आज दुपारी अचानक संतूक पिंपरी शिवारातील एका बांधावर थांबले. शेतात गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी निघालेले पालकमंत्री दिलीप कांबळे हे आज दुपारी अचानक संतूक पिंपरी शिवारातील एका बांधावर थांबले. शेतात गेले. शेतकऱ्यांची कैफियत ऐकली. मोक्याच्या वेळी पावसाने दगा दिल्याने शेतकºयांचा हंगाम हातचा गेल्याचे चित्र समोर आले.पालकमंत्र्यांसमवेत आ. रामराव वडकुते, आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, कळमनुरीचे एसडीओ प्रशांत खेडेकर, कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार गजानन शिंदे, बीडीओ डॉ. मिलींद पोहरे, पोनि मारुती थोरात, भाजपचे रामरतन शिंदे, नगरसेवक गणेश बांगर, उत्तमराव जगताप, के.के. शिंदे, माधव कोरडे, बालाजी घुगे आदींसह अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.संतूक पिंपरी येथील एका शेतात पालकमंत्री दिलीप कांबळे लवाजम्यासह गेले होते. तेथे कपासीचे अत्यंत वाईट हाल होते. जेमतेम पाच ते पंधरा बोंडे होती. तर तूर जागीच वाळत होती. त्याला एकही फूल दिसत नव्हते. या शेताची मालकीण गंगासागर यांच्याशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी आढळले की, सासºयाला अर्धांगवायू झाला. सासूचा अपघात झाल्याने पायात रॉड टाकला. पतीचे दहा वर्षांपूर्वीच मरण पावला. दोन मुलांसह कुटुंबाची गुजराण करण्याची जबाबदारी गंगासागर ज्ञानेश्वर झिप्परगे या महिलेवरच पडली आहे. त्यांना दोन एकरात दहा किलो कापूस झाला. आणखी एखादा क्विंटल होईल, अशी स्थिती आहे. दहा हजारांचा खर्च केला. तोही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. चाळीस ते पन्नास हजारांची मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली. दुसºया शेतात एकरात दोन क्ंिवटल सोयाबीन झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही, असेही त्यांनी सांगितले. तर कोणी मार्गदर्शन करीत नाही. तरीही चाळीस ते पन्नास हजारांचे उत्पादन होते. यंदा मात्र खायचे हाल होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.तर राहोली शिवारातील शेतकरी त्र्यंबक बोरकर यांच्या शेतातही पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी बोरकर म्हणाले, आमचे यंदा मोठे हाल आहेत. सोयाबीनचा उतार चांगला आला नाही. तूरही हातची गेली आहे. खरीपची पिके गेली. आता रबी पीक काही येणार नाही. पाणीच नाही तर देणार कुठून? काहींनी वीजप्रश्नाचा मुद्दाही त्यांच्याकडे मांडला.त्यानंतर पालकमंत्र्यांनी केसापूर, काळकोंडी, नवलगव्हाण आदी भागात दौरा केला. यावेळी खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे यांनीही त्यांची भेट घेत वसमत व औंढा तालुक्याला दुष्काळग्रस्तांच्या यादीत घेण्याची मागणी केली. यावेळी विनायक देशमुख, बाबा नाईक, सुरेश सराफ, रवी पाटील आदी उपस्थित होते.पूर्ण दुष्काळ जाहीर करा : सातवहिंगोली : खरीप हंगामात उत्पादन खर्च देखील निघण्याची शक्यता नसतांना पाण्याअभावी रबीची अपेक्षाच करता येत नसल्याने लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी खा.राजीव सातव यांनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे केलीे.हिवाळ्यातच पाणीटंचाईचे सावट आहे. जनावरांसाठी चारा टंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. कर्जमाफीत अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित आहेत.बोंडअळीचे अनुदानही शेतकर्यांना मिळालेले नाही. हमीभाव खरेदी केंद्रही अद्याप सुरू झालेले नाहीत.लोकसभा क्षेत्रात सर्व तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती असूनही प्रशासनाने चुकीची आणेवारी सादर केल्याने शेतकºयांना पीकविम्यापासून वंचित रहावे लागणार आहे. शासनाने मदत न केल्यास शेतकºयांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचेही सातव यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीministerमंत्री