शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांसमोर दुष्काळग्रस्तांचे गा-हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:26 IST

दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी निघालेले पालकमंत्री दिलीप कांबळे हे आज दुपारी अचानक संतूक पिंपरी शिवारातील एका बांधावर थांबले. शेतात गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी निघालेले पालकमंत्री दिलीप कांबळे हे आज दुपारी अचानक संतूक पिंपरी शिवारातील एका बांधावर थांबले. शेतात गेले. शेतकऱ्यांची कैफियत ऐकली. मोक्याच्या वेळी पावसाने दगा दिल्याने शेतकºयांचा हंगाम हातचा गेल्याचे चित्र समोर आले.पालकमंत्र्यांसमवेत आ. रामराव वडकुते, आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, कळमनुरीचे एसडीओ प्रशांत खेडेकर, कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार गजानन शिंदे, बीडीओ डॉ. मिलींद पोहरे, पोनि मारुती थोरात, भाजपचे रामरतन शिंदे, नगरसेवक गणेश बांगर, उत्तमराव जगताप, के.के. शिंदे, माधव कोरडे, बालाजी घुगे आदींसह अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.संतूक पिंपरी येथील एका शेतात पालकमंत्री दिलीप कांबळे लवाजम्यासह गेले होते. तेथे कपासीचे अत्यंत वाईट हाल होते. जेमतेम पाच ते पंधरा बोंडे होती. तर तूर जागीच वाळत होती. त्याला एकही फूल दिसत नव्हते. या शेताची मालकीण गंगासागर यांच्याशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. त्यावेळी आढळले की, सासºयाला अर्धांगवायू झाला. सासूचा अपघात झाल्याने पायात रॉड टाकला. पतीचे दहा वर्षांपूर्वीच मरण पावला. दोन मुलांसह कुटुंबाची गुजराण करण्याची जबाबदारी गंगासागर ज्ञानेश्वर झिप्परगे या महिलेवरच पडली आहे. त्यांना दोन एकरात दहा किलो कापूस झाला. आणखी एखादा क्विंटल होईल, अशी स्थिती आहे. दहा हजारांचा खर्च केला. तोही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. चाळीस ते पन्नास हजारांची मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली. दुसºया शेतात एकरात दोन क्ंिवटल सोयाबीन झाले. त्यामुळे खर्चही निघाला नाही, असेही त्यांनी सांगितले. तर कोणी मार्गदर्शन करीत नाही. तरीही चाळीस ते पन्नास हजारांचे उत्पादन होते. यंदा मात्र खायचे हाल होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.तर राहोली शिवारातील शेतकरी त्र्यंबक बोरकर यांच्या शेतातही पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी बोरकर म्हणाले, आमचे यंदा मोठे हाल आहेत. सोयाबीनचा उतार चांगला आला नाही. तूरही हातची गेली आहे. खरीपची पिके गेली. आता रबी पीक काही येणार नाही. पाणीच नाही तर देणार कुठून? काहींनी वीजप्रश्नाचा मुद्दाही त्यांच्याकडे मांडला.त्यानंतर पालकमंत्र्यांनी केसापूर, काळकोंडी, नवलगव्हाण आदी भागात दौरा केला. यावेळी खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे यांनीही त्यांची भेट घेत वसमत व औंढा तालुक्याला दुष्काळग्रस्तांच्या यादीत घेण्याची मागणी केली. यावेळी विनायक देशमुख, बाबा नाईक, सुरेश सराफ, रवी पाटील आदी उपस्थित होते.पूर्ण दुष्काळ जाहीर करा : सातवहिंगोली : खरीप हंगामात उत्पादन खर्च देखील निघण्याची शक्यता नसतांना पाण्याअभावी रबीची अपेक्षाच करता येत नसल्याने लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी खा.राजीव सातव यांनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे केलीे.हिवाळ्यातच पाणीटंचाईचे सावट आहे. जनावरांसाठी चारा टंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. कर्जमाफीत अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित आहेत.बोंडअळीचे अनुदानही शेतकर्यांना मिळालेले नाही. हमीभाव खरेदी केंद्रही अद्याप सुरू झालेले नाहीत.लोकसभा क्षेत्रात सर्व तालुक्यांत दुष्काळसदृश्य परिस्थिती असूनही प्रशासनाने चुकीची आणेवारी सादर केल्याने शेतकºयांना पीकविम्यापासून वंचित रहावे लागणार आहे. शासनाने मदत न केल्यास शेतकºयांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचेही सातव यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीministerमंत्री