शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उधारी मागितल्याने कृषी केंद्र चालकाची चाकूने भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 20:05 IST

केवळ १९०० रुपये उधारीवरून ही घटना झाल्याचे समोर येत आहे. 

वसमत (हिंगोली) : येथील कृषी केंद्र चालक व्यापाऱ्याचा माळवटा पाटीवर चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. व्यापाऱ्याने एकास उधारी मागितल्याने हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयताच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. केवळ १९०० रुपये उधारीवरून ही घटना झाल्याचे समोर येत आहे. 

वसमत येथील नांदेड रोडवरील चौकडा व्यापारी संकुलात नवनाथ गोविंदराव नादरे (रा.माळवटा) यांचे कृषी केंद्र आहे. त्यांच्या दुकानावरून उधारीवर कृषी साहित्य घेवून गेलेल्या व्यक्तीस नादरे यांच्या मुनीमाने उधारी मागितली. त्यावरून वाद झाला. या वादात दुकानदार नवनाथ नादरे यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. यात ते जागीच ठार झाले. 

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलवर भरदिवसा हा प्रकार घडला. चाकूने भोसकल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. आरोपीला त्वरीत अटक करा अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेत ग्रामीण पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. यावेळी माळवटा येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येने हजर होते.  आरोपी पळसगाव येथील असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. घटनास्थळी सपोनि बळीराम बंदखडके, सपोउपनि कांबळे यांनी भेट दिली. भरदिवसा रस्त्यावर घडलेल्या या खुनाच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. उधारी फक्त १९०० रुपये होती, असे समोर येत आहे. आरोपी अटक झाल्यानंतरच खुनामागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली