शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

ड्रेनेज लाईन फुटल्याने डायलेसिस विभागात उपचार घेणे मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST

हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील वरच्या मजल्यावरील वॉर्ड क्र. २ वरून आलेली ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे डायलेसिस विभागासमोर घाण पाणी साचले ...

हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील वरच्या मजल्यावरील वॉर्ड क्र. २ वरून आलेली ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे डायलेसिस विभागासमोर घाण पाणी साचले जात आहे. कुजलेले अन्न व ड्रेनेजच्या पाण्यामुळे रुग्णांना तसेच उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांंनाही या घाणीचा त्रास होत आहे. अर्ज-विनंती करूनही काही उपयोग होत नाही, अशी तक्रार काही रुग्णांनी केली आहे.

१ जानेवारी २०१४ रोजी जिल्हा रुग्णालयात डायलेसिस विभागाची स्थापना करण्यात आली आहे. आजपर्यंत १३ हजार ३५० रुग्णांनी या विभागात उपचार घेतले आहेत. या विभागात किडणी विकारतज्ज्ञ १, वैद्यकीय अधिकारी १, परिसेविका १, डायलेसिस तंत्रज्ञ ३, अधिपरिसेविका ३ आणि सेवक २ असे कर्मचारी काम करतात. मागच्या वीस दिवसांपासून एका वॉर्डची ड्रेनेज लाईन फुटली आहे. त्यामुळे हे पाणी सरळ डायलेसिस विभागाजवळ येऊन पडते. त्यामुळे डायलेसिस विभागातील रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांना नाकाला रुमाल बांधून बसावे लागते. वाऱ्याची झुळूक आली की, दुर्गंधी हॉलमध्ये येते. याबाबत अनेक वेळा रुग्ण तसेच नातेवाइकांनी संबंधितांकडे तक्रार दिली आहे. परंतु, अजून तरी कोणीही लक्ष दिले नाही, असे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत उपचार घेतलेले रुग्ण....

२०१३-१४ मध्ये ३०, २०१४-१५ मध्ये १०५१, २०१५-१६ मध्ये १६४०, २०१६-१७ मध्ये १६५७, २०१७-१८ मध्ये २१६८, २०१८-१९ मध्ये २०६७ आणि २०२०-२१ मध्ये १९०७ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

कॉट संख्या वाढविण्याची मागणी...

जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस विभागाचा वॉर्ड लहान आहे. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी तो अडचणींचा ठरत आहे. हा विभाग पूर्वी वॉर्ड क्र. २ म्हणजे वरच्या मजल्यावर होता. काही दिवसांनी हा वॉर्ड बदलून खाली आणण्यात आला आहे. आजमितीस या विभागात चारच कॉट ठेवण्यात आले आहेत. एखादा रुग्ण जर वाढला तर त्यास बेंचवर झोपवले जाते. एखादा रुग्ण बरा झाला तर दुसऱ्या रुग्णास त्या ठिकाणी दाखल करून उपचार केला जातो.

ड्रेनेज लाईनबाबत सूचना केली आहे...

ड्रेनेज लाईन दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. डायलेसीस विभागासमोरील घाण व फुटलेला पाईप तातडीने दुरुस्त केला जाईल. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी जिल्हा रुग्णालय घेत आहे. रुग्णांंना काही अडचणी असतील तर त्यांनी जिल्हा व्यवस्थापनाला कळवाव्यात.

- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक