शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 13, 2022 18:41 IST

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गोरेगाव (जि. हिंगोली) : गोरेगावसह सेनगाव तालुक्यातील तीन ते चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती पसरली असताना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर एका शेतकरी तरुणाने चक्क रक्ताने पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे करीत अतिवृष्टीचे अनुदान सरसकट देण्याची मागणी केली आहे.

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांच्या नासाडीमुळे उत्पन्न घटीची शक्यता बघता पुरता हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा होती. परंतु शासनाकडून सेनगाव तालुक्याला अतिवृष्टीसाठी एकूण ३२ कोटी २३ लाख ४७ हजार २०० रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात असताना गोरेगावसह बाभूळगाव आजेगाव व पुसेगाव हे चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती आहे. खरीप पिकांचे नुकसान होऊनही अतिवृष्टीतून वगळल्या गेल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत ताकतोडा येथील नामदेव पतंगे या तरुण शेतकऱ्याने आपल्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा प्रश्न केला आहे. सेनगाव तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतपिकाची नासाडी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीतून काही मंडळांना डावलण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. आधीच नापिकी, त्यातच कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावीत खासगी फायनान्स कंपन्यांनी नाकीनऊ आणले असून, अशावेळी आम्ही जगायचे कसे ते सांगा? आम्ही रक्ताचा अभिषेक करून आमचा जीव सोडून देऊ, असेही पत्रात नमूद करण्यात आले. तसेच पीक नुकसानीबाबत अतिवृष्टी अनुदान सरसकट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲपद्वारे तहसीलदारांना पत्र...रक्ताने लिहिलेले पत्र सेनगावचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठविले आहे. हेच पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या पत्राची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर द्यावे. रक्ताने लिहिलेले पत्र नायब तहसीलदार सुनील कावरखे यांना सुपुर्द केल्याची माहिती नामदेव पतंगे यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसHingoliहिंगोली