शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 13, 2022 18:41 IST

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गोरेगाव (जि. हिंगोली) : गोरेगावसह सेनगाव तालुक्यातील तीन ते चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती पसरली असताना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तर एका शेतकरी तरुणाने चक्क रक्ताने पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे करीत अतिवृष्टीचे अनुदान सरसकट देण्याची मागणी केली आहे.

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांच्या नासाडीमुळे उत्पन्न घटीची शक्यता बघता पुरता हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा होती. परंतु शासनाकडून सेनगाव तालुक्याला अतिवृष्टीसाठी एकूण ३२ कोटी २३ लाख ४७ हजार २०० रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात असताना गोरेगावसह बाभूळगाव आजेगाव व पुसेगाव हे चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती आहे. खरीप पिकांचे नुकसान होऊनही अतिवृष्टीतून वगळल्या गेल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत ताकतोडा येथील नामदेव पतंगे या तरुण शेतकऱ्याने आपल्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा प्रश्न केला आहे. सेनगाव तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतपिकाची नासाडी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीतून काही मंडळांना डावलण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. आधीच नापिकी, त्यातच कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावीत खासगी फायनान्स कंपन्यांनी नाकीनऊ आणले असून, अशावेळी आम्ही जगायचे कसे ते सांगा? आम्ही रक्ताचा अभिषेक करून आमचा जीव सोडून देऊ, असेही पत्रात नमूद करण्यात आले. तसेच पीक नुकसानीबाबत अतिवृष्टी अनुदान सरसकट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲपद्वारे तहसीलदारांना पत्र...रक्ताने लिहिलेले पत्र सेनगावचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठविले आहे. हेच पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या पत्राची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर द्यावे. रक्ताने लिहिलेले पत्र नायब तहसीलदार सुनील कावरखे यांना सुपुर्द केल्याची माहिती नामदेव पतंगे यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसHingoliहिंगोली