शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

सिंचन अनुशेष दूर करण्याऐवजी पाणी पळविणाऱ्यांना साथ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा विभागाचे सचिव कुलकर्णी, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा विभागाचे सचिव कुलकर्णी, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खा. शिवाजी माने, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह या विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुरुवातीला जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतला. त्यात पैनगंगा व सिद्धेश्वर धरणांच्या कालव्यांची दुरवस्था झाल्याचा मुद्दा समोर आला. त्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला असून, त्याला ५०० कोटी लागणार असल्याचे सांगण्यात आले. या कालव्यांना गेट नाहीत. जागोजागी फुटल्याने ३० टक्के गळती असल्याचे दांडेगावकर यांनी निदर्शनास आणून दिले. ४५ कि.मी.चे हे कालवे आहेत. दुरुस्तीसाठी नांदेडहून मेकॅनिकलचा उपविभाग हलविण्याची सूचनाही मंत्री पाटील यांनी केली, तर नवीन मशिनरी दिल्यास बऱ्यापैकी दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी सापळी रद्द झाल्याने इसापूरमध्ये टाकायच्या १९९ द.ल.घ.मी. पाण्याचा विषय निघाला. त्यावर आ. मुटकुळे व माजी खा. माने यांनी विरोध दर्शविला, तर अनुशेष मंजूर होऊनही त्याची कामे होत नाहीत. जर हे पाणी वळविले तर खाली पाणीच शिल्लक राहणार नाही. कळमनुरी पूर्ण, तर हिंगोली व औंढ्याचा काही भाग वाळवंट होईल, असे त्यांनी सांगितले. आताही १०८ द.ल.घ.मी. इसापूरकडे, ८५ द.ल.घ.मी. विदर्भाला देऊन २४ द.ल.घ.मी.च पाणी उरले. तरीही उच्च पातळी बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता दिली जात नाही, ती देण्याची मागणी केली. तसेच जांभरुण, सुकळी हे प्रकल्प मापदंडात बसत नसल्याचे सांगून, अडल्याने त्यांना मान्यता देण्याची मागणी मुटकुळे यांनी केली. तसेच पाणी वळविण्यापेक्षा सापळी धरण करा, आमच्या भागात पाणी साठेल, असे माने यांनी सांगितले. तसेच जनतेचा विरोधही नसल्याचे ते म्हणाले. आता हा नवा वादाचा विषयही होऊ शकतो.

पूर्णेवर चार बंधाऱ्यांसाठी हिरवा झेंडा

यावेळी आ. राजू नवघरे यांनीही पूर्णा नदीवरील पोटा, जोडपरळी, पिंपळगाव कुटे व ममदापूर या चार उच्चपातळी बंधाऱ्यांची मागणी केली. त्यावर हे बंधारेही मापदंडात बसत नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर मंत्री पाटील यांनी, अनुशेषात विशेष बाब म्हणून राज्यपालांना याबाबत पत्र देऊन मंजुरी दिली पाहिजे, असे सांगितले. यानंतर पुन्हा किमती वाढल्यास दीड टक्क्यावरून लाभान्वय त्याहीपुढे जाईल. यावर सर्वांनी सकारात्मकता दाखवा. केवळ औपचारिकता न मानता अडचणी दूर होतील, असे पाहण्यास सांगितले.