शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अनुशेष दूर करण्याऐवजी पाणी पळविणाऱ्यांना साथ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा विभागाचे सचिव कुलकर्णी, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा विभागाचे सचिव कुलकर्णी, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खा. शिवाजी माने, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह या विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुरुवातीला जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतला. त्यात पैनगंगा व सिद्धेश्वर धरणांच्या कालव्यांची दुरवस्था झाल्याचा मुद्दा समोर आला. त्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला असून, त्याला ५०० कोटी लागणार असल्याचे सांगण्यात आले. या कालव्यांना गेट नाहीत. जागोजागी फुटल्याने ३० टक्के गळती असल्याचे दांडेगावकर यांनी निदर्शनास आणून दिले. ४५ कि.मी.चे हे कालवे आहेत. दुरुस्तीसाठी नांदेडहून मेकॅनिकलचा उपविभाग हलविण्याची सूचनाही मंत्री पाटील यांनी केली, तर नवीन मशिनरी दिल्यास बऱ्यापैकी दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी सापळी रद्द झाल्याने इसापूरमध्ये टाकायच्या १९९ द.ल.घ.मी. पाण्याचा विषय निघाला. त्यावर आ. मुटकुळे व माजी खा. माने यांनी विरोध दर्शविला, तर अनुशेष मंजूर होऊनही त्याची कामे होत नाहीत. जर हे पाणी वळविले तर खाली पाणीच शिल्लक राहणार नाही. कळमनुरी पूर्ण, तर हिंगोली व औंढ्याचा काही भाग वाळवंट होईल, असे त्यांनी सांगितले. आताही १०८ द.ल.घ.मी. इसापूरकडे, ८५ द.ल.घ.मी. विदर्भाला देऊन २४ द.ल.घ.मी.च पाणी उरले. तरीही उच्च पातळी बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता दिली जात नाही, ती देण्याची मागणी केली. तसेच जांभरुण, सुकळी हे प्रकल्प मापदंडात बसत नसल्याचे सांगून, अडल्याने त्यांना मान्यता देण्याची मागणी मुटकुळे यांनी केली. तसेच पाणी वळविण्यापेक्षा सापळी धरण करा, आमच्या भागात पाणी साठेल, असे माने यांनी सांगितले. तसेच जनतेचा विरोधही नसल्याचे ते म्हणाले. आता हा नवा वादाचा विषयही होऊ शकतो.

पूर्णेवर चार बंधाऱ्यांसाठी हिरवा झेंडा

यावेळी आ. राजू नवघरे यांनीही पूर्णा नदीवरील पोटा, जोडपरळी, पिंपळगाव कुटे व ममदापूर या चार उच्चपातळी बंधाऱ्यांची मागणी केली. त्यावर हे बंधारेही मापदंडात बसत नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर मंत्री पाटील यांनी, अनुशेषात विशेष बाब म्हणून राज्यपालांना याबाबत पत्र देऊन मंजुरी दिली पाहिजे, असे सांगितले. यानंतर पुन्हा किमती वाढल्यास दीड टक्क्यावरून लाभान्वय त्याहीपुढे जाईल. यावर सर्वांनी सकारात्मकता दाखवा. केवळ औपचारिकता न मानता अडचणी दूर होतील, असे पाहण्यास सांगितले.