शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अनुशेष दूर करण्याऐवजी पाणी पळविणाऱ्यांना साथ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा विभागाचे सचिव कुलकर्णी, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा विभागाचे सचिव कुलकर्णी, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खा. शिवाजी माने, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह या विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुरुवातीला जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतला. त्यात पैनगंगा व सिद्धेश्वर धरणांच्या कालव्यांची दुरवस्था झाल्याचा मुद्दा समोर आला. त्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला असून, त्याला ५०० कोटी लागणार असल्याचे सांगण्यात आले. या कालव्यांना गेट नाहीत. जागोजागी फुटल्याने ३० टक्के गळती असल्याचे दांडेगावकर यांनी निदर्शनास आणून दिले. ४५ कि.मी.चे हे कालवे आहेत. दुरुस्तीसाठी नांदेडहून मेकॅनिकलचा उपविभाग हलविण्याची सूचनाही मंत्री पाटील यांनी केली, तर नवीन मशिनरी दिल्यास बऱ्यापैकी दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी सापळी रद्द झाल्याने इसापूरमध्ये टाकायच्या १९९ द.ल.घ.मी. पाण्याचा विषय निघाला. त्यावर आ. मुटकुळे व माजी खा. माने यांनी विरोध दर्शविला, तर अनुशेष मंजूर होऊनही त्याची कामे होत नाहीत. जर हे पाणी वळविले तर खाली पाणीच शिल्लक राहणार नाही. कळमनुरी पूर्ण, तर हिंगोली व औंढ्याचा काही भाग वाळवंट होईल, असे त्यांनी सांगितले. आताही १०८ द.ल.घ.मी. इसापूरकडे, ८५ द.ल.घ.मी. विदर्भाला देऊन २४ द.ल.घ.मी.च पाणी उरले. तरीही उच्च पातळी बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता दिली जात नाही, ती देण्याची मागणी केली. तसेच जांभरुण, सुकळी हे प्रकल्प मापदंडात बसत नसल्याचे सांगून, अडल्याने त्यांना मान्यता देण्याची मागणी मुटकुळे यांनी केली. तसेच पाणी वळविण्यापेक्षा सापळी धरण करा, आमच्या भागात पाणी साठेल, असे माने यांनी सांगितले. तसेच जनतेचा विरोधही नसल्याचे ते म्हणाले. आता हा नवा वादाचा विषयही होऊ शकतो.

पूर्णेवर चार बंधाऱ्यांसाठी हिरवा झेंडा

यावेळी आ. राजू नवघरे यांनीही पूर्णा नदीवरील पोटा, जोडपरळी, पिंपळगाव कुटे व ममदापूर या चार उच्चपातळी बंधाऱ्यांची मागणी केली. त्यावर हे बंधारेही मापदंडात बसत नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर मंत्री पाटील यांनी, अनुशेषात विशेष बाब म्हणून राज्यपालांना याबाबत पत्र देऊन मंजुरी दिली पाहिजे, असे सांगितले. यानंतर पुन्हा किमती वाढल्यास दीड टक्क्यावरून लाभान्वय त्याहीपुढे जाईल. यावर सर्वांनी सकारात्मकता दाखवा. केवळ औपचारिकता न मानता अडचणी दूर होतील, असे पाहण्यास सांगितले.