शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

वसमतमध्ये दुर्गंधीने बसवत नाही... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:56 IST

वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई पसरण्याच्या भीतीने नागरिक हैराण असल्यानचे चित्र येथे पहायला मिळते.

ठळक मुद्देगल्ली बोळात कचऱ्याचे ढिगारे; आरोग्य बिघडण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई पसरण्याच्या भीतीने नागरिक हैराण असल्यानचे चित्र येथे पहायला मिळते.वसमत तालुका व उपजिल्हा ठिकाण मोठी बाजारपेठ, उत्पन्नाच्या, शिक्षणाच्या व आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी शहरात मात्र स्वच्छतेच्या नावाने ‘बोलाचीच कढी आन् बोलाचाच भात’! या म्हणी प्रमाने केवळ फलक, कचरा पेट्या, घंटा गाड्याच पहायला मिळतात. शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोरील पेट्रोल पंपाच्या बाजूस, बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या पूर्वेकडील गेटवर, वसमतशहरातील सार्वजनिक वाचनालयासमोर, भाजीमंडी परिसर, जवाहर बालक विद्यालयाच्या बाजूस, श्री योगानंद महाविद्यालय रस्त्याच्या बाजूसह महाविद्यालयाजवळच कच-याचे ढिगारे साचल्याने दुर्गंधीसह परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. भाजीपाला विक्रेते जून्या तहसीलसमोर कच-यातच बसतात;परंतु नागरिकांना नाईजाने माशा बसलेला भाजीपाला घ्यावा लागतो. उपजिल्हा रुग्णालय परिसरात,सार्वजनिक शौचालय गंगाप्रसाद अग्रवाल मार्केट परिसरासह स्त्री रूग्णालयाकडे जाण्याच्या मार्गातील परभणी रोडवरील दाद-याला लागूनच टाकाऊ मांस, चरबी, चारवट, पंख अशा स्वरूपातील अतिशय दुर्गंधी निर्माण करणारा कचरा वाटेत टाकला जातो. त्यामुळे येथे डुकरासह कुत्र्यांचा ऊत आल्यामुळे रूग्णासह, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचा-यांना रूग्णालयात जाण्यासाठी त्रास होत आहे. अशा कच-यासह शहरातही गल्लोगल्ली देखील कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई व दुर्गंधी पसरण्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त आहेत. स्वच्छ भारत मिशन च्या नावाखाली शासनाने लाखो रुपये खर्च करूनही शहरात अस्वच्छता मात्र कायम आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी होऊन जागोजागी फलक व कचरा पेट्याच लावण्यात आल्या. लोकजागृती व प्रत्यक्ष कार्यवाही कागदावरच आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.---प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे...योगानंद स्वामी महाविद्यालयात जातांना देखील विद्यार्थी व महाविद्यालयीन कर्मचार्यांना नगरपालिकेच्या घंटागाडीकडून टाकल्या जाणा-या कच-यामुळे प्रचंड त्रास होतो. या कचरा ढिगा-याच्या बाजूलाच महाविद्यालय असल्याने कच-याच्या दुर्गंधीचाही त्रास होत असल्याने प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन शहरातील कचरा उचलण्यासह तो वस्ती, माणसांच्या वर्दळीपासून दूर टाकावा, अशी मागणी सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPlastic banप्लॅस्टिक बंदी