शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमध्ये दुर्गंधीने बसवत नाही... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:56 IST

वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई पसरण्याच्या भीतीने नागरिक हैराण असल्यानचे चित्र येथे पहायला मिळते.

ठळक मुद्देगल्ली बोळात कचऱ्याचे ढिगारे; आरोग्य बिघडण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत शहर हे उपजिल्हा ठिकाणासह शहर म्हणून कित्येक वर्षांपासून परिचित असून स्वच्छ भारत मिशन नुसार स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी शहरात शाळा-महाविद्यालयासह परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी बरोबरच विविध गल्लीबोळात कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई पसरण्याच्या भीतीने नागरिक हैराण असल्यानचे चित्र येथे पहायला मिळते.वसमत तालुका व उपजिल्हा ठिकाण मोठी बाजारपेठ, उत्पन्नाच्या, शिक्षणाच्या व आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी शहरात मात्र स्वच्छतेच्या नावाने ‘बोलाचीच कढी आन् बोलाचाच भात’! या म्हणी प्रमाने केवळ फलक, कचरा पेट्या, घंटा गाड्याच पहायला मिळतात. शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोरील पेट्रोल पंपाच्या बाजूस, बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या पूर्वेकडील गेटवर, वसमतशहरातील सार्वजनिक वाचनालयासमोर, भाजीमंडी परिसर, जवाहर बालक विद्यालयाच्या बाजूस, श्री योगानंद महाविद्यालय रस्त्याच्या बाजूसह महाविद्यालयाजवळच कच-याचे ढिगारे साचल्याने दुर्गंधीसह परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. भाजीपाला विक्रेते जून्या तहसीलसमोर कच-यातच बसतात;परंतु नागरिकांना नाईजाने माशा बसलेला भाजीपाला घ्यावा लागतो. उपजिल्हा रुग्णालय परिसरात,सार्वजनिक शौचालय गंगाप्रसाद अग्रवाल मार्केट परिसरासह स्त्री रूग्णालयाकडे जाण्याच्या मार्गातील परभणी रोडवरील दाद-याला लागूनच टाकाऊ मांस, चरबी, चारवट, पंख अशा स्वरूपातील अतिशय दुर्गंधी निर्माण करणारा कचरा वाटेत टाकला जातो. त्यामुळे येथे डुकरासह कुत्र्यांचा ऊत आल्यामुळे रूग्णासह, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचा-यांना रूग्णालयात जाण्यासाठी त्रास होत आहे. अशा कच-यासह शहरातही गल्लोगल्ली देखील कच-याचे ढिगारे साचल्याने परिसरात रोगराई व दुर्गंधी पसरण्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त आहेत. स्वच्छ भारत मिशन च्या नावाखाली शासनाने लाखो रुपये खर्च करूनही शहरात अस्वच्छता मात्र कायम आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी होऊन जागोजागी फलक व कचरा पेट्याच लावण्यात आल्या. लोकजागृती व प्रत्यक्ष कार्यवाही कागदावरच आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.---प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे...योगानंद स्वामी महाविद्यालयात जातांना देखील विद्यार्थी व महाविद्यालयीन कर्मचार्यांना नगरपालिकेच्या घंटागाडीकडून टाकल्या जाणा-या कच-यामुळे प्रचंड त्रास होतो. या कचरा ढिगा-याच्या बाजूलाच महाविद्यालय असल्याने कच-याच्या दुर्गंधीचाही त्रास होत असल्याने प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन शहरातील कचरा उचलण्यासह तो वस्ती, माणसांच्या वर्दळीपासून दूर टाकावा, अशी मागणी सामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPlastic banप्लॅस्टिक बंदी