शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

न घाबरता बालकांचे लसीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:10 IST

जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम मागील ५ दिवसांपासून सुरू आहे. ही लस दिल्यानंतर बालकांना कुठलाही धोका नाही. सध्या व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र काही किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात कुणालाही गंभीर रिअ‍ॅक्शन झाले नाही. त्यामुळे पालकांनी न घाबरता मुलांना गोवर रुबेला लस देण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम मागील ५ दिवसांपासून सुरू आहे. ही लस दिल्यानंतर बालकांना कुठलाही धोका नाही. सध्या व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र काही किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात कुणालाही गंभीर रिअ‍ॅक्शन झाले नाही. त्यामुळे पालकांनी न घाबरता मुलांना गोवर रुबेला लस देण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.जिल्ह्यातील एकूण ३ लाख १८ हजार २३० बालकांना गोवर रूबेला ही लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २४ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३२ उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय ४, उपजिल्हा रुग्णालय १ , जि.रु.१ व शाळा १२९५ , अंगडवाडी १२१४ इत्यादी ठिकाणी लस देणे चालू आहे. प्रशिक्षित २९८ लस टोचक उपलब्ध आहेत. आपल्या जिल्ह्यात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही ७६३६३ बालकांना देण्यात आली आहे. टफ ही लस एकाच इंजेक्शनद्वारे देण्यात येते. तुरळक प्रमाणात काही मुलांना खाज, होऊ शकते परंतु भीतीसारखे काही नाही. मनात भीती बाळगल्याने पण असे त्रास होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पालकांनी न घाबरता आपल्या पाल्यांना लसीकरण करुण घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी केले. सध्या सुरु असलेल्या शाळेतील लसीकरणासाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. गोवर रुबेलाची लस असलेले एकच इंजेक्शन देण्यात येते. लसीकरण झाल्यानंतर त्यांना शाळेतच अर्धा तास प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. गरज पडली तर त्यांना शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात नेण्यासाठी अम्ब्युलन्स ठेवली आहे. प्रत्येक पथकासोबत एक वाहन ठेवले, असे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी सांगितले.लसीकरण करुन घेण्याअगोदर मुलांना जेवायला द्या, आपल्या मुलांना लसीकरणाची भीती वाटत असेल तर त्यांना भिती न बाळगण्याचा आत्मविश्वास द्या, तीव्र ताप आल्यास किंवा गंभीर आजारी असल्यास लस देऊ नये, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार यांनी सांगितले.गोवर रुबेला लसीकरणामुळे जर लालसर पुरळ किंवा खाज येणे अशी लक्षणे दिसल्यास घाबरु नये. अशी समस्या उदभवल्यास आपोआप ठिक होते. ज्या मुलांना शाळेत लस देण्यात येणार आहे. तेथील वातावरण खेळीमेळीचे व मनोरंजक ठेवावे, असे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रुणवाल म्हणाले.लसीकरण झाल्यावर बालकांना विश्रांतीची आवश्यकता असते. ते देणे गरजेचे आहे. तर मनोरंजनातून आपण लस घेतली हे बालक विसरल्यास त्यांची प्रकृती चांगली राहत असते. टफ ही लस सुरक्षित आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाHealthआरोग्य