शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जळित वॉर्डमधील रूग्णांचे बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:16 IST

: एखाद्या दुर्घटनेतील जळालेला रूग्ण जर जिल्हा रूग्णालयात दाखल झाला तर, या गंभीर रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत व त्यांचे प्राण वाचविता यावेत, यासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा आवश्यक आहे. मात्र हिंगोली जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ मध्येच अपुऱ्या जागेत जळित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणज उन्हाळ्यातसुद्धा जळित रूग्णांसाठी साधी कूलरचीही सुविधा नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एखाद्या दुर्घटनेतील जळालेला रूग्ण जर जिल्हा रूग्णालयात दाखल झाला तर, या गंभीर रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत व त्यांचे प्राण वाचविता यावेत, यासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा आवश्यक आहे. मात्र हिंगोली जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ मध्येच अपुऱ्या जागेत जळित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणज उन्हाळ्यातसुद्धा जळित रूग्णांसाठी साधी कूलरचीही सुविधा नाही.जिल्हा रूग्णालयाच्या नवीन इमारत हस्तांतरणाची प्रक्रिया संथगतिने सुरू आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाºया रूग्णांचे सुविधेविना बेहाल होत आहेत. शिवाय कार्यरत डॉक्टर व परिचारिकांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र जळित वार्डाची स्थापन केली नाही. महिलांचा वार्ड क्रमांक १ मध्येच एका कोपºयात जळित कक्ष उभारण्यात आला आहे. अपुºया जागेत कक्ष असल्यामुळे उपचार करतानाही अडचणी निर्माण होतात. रूग्णालयात रात्रीच्यावेळी कर्तव्य पार पाडताना महिला कर्मचाºयांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय परिचारिकांना नाहक त्रास दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रात्री-अपरात्री परिचारिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.निम्म्यांहून अधिक फॅन बंदच - रूग्णालयातील निम्म्याहून अधिक पंख बंद पडले आहेत. ऐन उन्हाळ्यात तरी हे पंखे सुरू करणे आवश्यक होते. तर काही ठिकाणच्या विद्युत उपकरणात किरकोळ बिघाड झालेले आहेत. याकडे मात्र वैद्यकीय अधिकारी व संबधित विभाग लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे रूग्णालयाचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे. शिवाय मागील चार दिवसांपासून रूग्णालयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनही फुटली आहे.रूग्णालयातील वार्ड क्रमांक १ मध्ये जळित रूग्णांवर उपचार केले जातात. परंतु भर उन्हाळ्यातही या ठिकाणी साधी कुलरची व्यवस्था करण्यात आली नाही, हे विशेष. शिवाय येथील पंखाही बंदावस्थेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे रूग्णांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत.जिल्हा रूग्णालयात विविध दुर्घटनेतील मागील चार महिन्यांत १९ जळीत रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी एका बालकावर सध्या उपचार सुरू असल्याचे सोमवारी दिसून आले. यावेळी डॉक्टर उपचार करताना दिसत होते.जिल्हा रूग्णालयात रात्रीच्या वेळी कर्तव्य पार पाडताना महिला कर्मचाºयांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय परिचारिकांना नाहक त्रास दिल्या जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग