शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तक्रारींनंतरही प्रज्ञा सातवच विधान परिषद उमेदवार

By विजय पाटील | Updated: July 1, 2024 22:16 IST

- विजय पाटील  हिंगोली : मागील काही दिवसांपासून काँग्रेस व शिवसेना उबाठाच्या वतीने सातत्याने आ. प्रज्ञा सातव यांनी लोकसभेच्या ...

- विजय पाटील 

हिंगोली : मागील काही दिवसांपासून काँग्रेस व शिवसेना उबाठाच्या वतीने सातत्याने आ. प्रज्ञा सातव यांनी लोकसभेच्या निवडणुकीत काम केले नसल्याच्या तक्रारी होत होत्या. तरीही काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव यांनाच विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने त्यांच्या राजकीय विरोधकांना चांगलीच चपराक बसली आहे. तर पुन्हा गटातटाच्या राजकारणाला वेग येणार असल्याचे दिसत आहे.

हिंगोली लोकसभेची निवडणूक लढण्यास डॉ. प्रज्ञा सातव इच्छुक होत्या. त्यांनी तयारीही सुरू केली होती. त्यांचे पती राजीव सातव या मतदारसंघात खासदार राहिले होते. त्यामुळे त्यांनी जोरदार दावा केला. मात्र आघाडीत ही जागा शिवसेना उबाठा गटाला सुटली. आता त्यांनी विधानसभेची तयारी चालविली होती. कळमनुरीच्या जागेवर त्यांचा दावा होता. मात्र तेथे शिवसेना उबाठाही दावा करीत आहे. त्यामुळे पुन्हा संघर्षाची चिन्हे होती. त्यातच निवडणूक होऊन दीड महिन्याचा काळ लोटल्यानंतर सातव यांच्याविषयी काँग्रेसच्या गोटातूनच पहिली तक्रार झाली. यावरून सुपारी घेऊन तक्रारीचे आरोपही होत होते.

काँग्रेसमधूनच तक्रार झाल्याने शिवसेना उबाठाचे नवनिर्वाचित खा. नागेश आष्टीकर यांनीही पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार केली होती. सातव यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप केला होता. तर चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्यानंतर सातव यांनी विधान परिषदेसाठीच आणखी जोर लावला. त्यात त्या यशस्वीही झाल्या आहेत.

काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर केली. तर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने ही उमेदवारी जाहीर केल्याचे म्हटले. राज्यातील काँग्रेस आमदारांचे संख्याबळ पाहता सातव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सातव या पुन्हा आमदार झाल्यानंतर हिंगोलीतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. गटातटाच्या राजकारणात सातव यांना पाण्यात पाहणाऱ्यांना मात्र ही चपराक मानली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीVidhan Parishadविधान परिषद