शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

हिंगोली जिल्ह्यात डेंग्यूचे थैमान कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:57 IST

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यू आजाराने थैमान घातले असून दोघांचा बळीही गेला. आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप तपासणी अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यू आजाराने थैमान घातले असून दोघांचा बळीही गेला. आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप तपासणी अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला नाही.जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दिवसेंदिवस तापाचे व इतर साथरोग लागण झालेले रूग्ण येत आहेत. परंतु मागील एक महिन्यात डेंग्यूसदृश्य आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आरोग्य विभागाकडून खेडोपाडी जाऊन रक्तजल नमुने घेतले जात आहेत. शिवाय अबेटिंग व धूर फवारणी केली जात आहे. उपाय-योजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र डेंग्यू आजाराच्या रूग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. विशेष म्हणजे शहरी भागात मात्र धूरफवारणीकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. हिंगोली शहरात पालिकेकडून साधी धूरफवारणी होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. नगरसेवकही हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, डासांचा उपद्रव वाढत असून तापाच्या रूग्णांत वाढ होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हिंगोली शहरातील मिलिंद कॉलनी येथील शशिकला शिरपले (३७) या महिलेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना जिल्हा रुग्णालयात घडली होती. यापुर्वीही एका मुलीचा डेंग्यूने संशयास्पद मृत्यू झाला होता. परंतु याबाबत जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डेंग्यूच्या आजाराचे जिल्ह्यात थैमान सुरू असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणाही निद्रावस्थेत आहे.आरोग्य यंत्रणेकडून डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करणे गरजचे आहे. तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक काळ ताप कमी होत नसेल तर तो डेंग्यूचा असू शकतो़ तापीमध्येच पोट दुखणे, अंग, डोके दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे, अंगावर पुरळ येणे, अंग सुजणे, डोळे लाल होणे अशी तापीची लक्षणे आहेत़कोरडा दिवस राबविण्याचा पत्ता नाही४जिल्ह्यात सगळीकडूनच डेंग्यूसदृश्य आजाराबाबत तक्रारी वाढल्या आहेत. खाजगी रुग्णालयात अनेक रुग्ण पॉजिटीव्ह आढळले. तरीही जिल्हा प्रशासन मात्र या सर्व प्रकारावर उपाय राबविताना दिसत नाही. निदान कोरडा दिवस पाळण्याचा उपाय तरी घोषित करणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील साचलेले गटार, डबके, टायर, करवंट्यात साचलेल्या पाण्याची स्वच्छता याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय साथरोग बाबतही जनजागृती नाही.रोजच दोनशेवर रुग्ण४दरम्यान अनेक खाजगी रुग्णालयात दररोज दोनशेवर रुग्ण व्हायरल, डेंग्यू व इतर आजारांचे येत आहेत. यात प्रामुख्याने तापाचा आजार जडलेला रुग्णांचा मोठा समावेश आहे. एकतर शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचे रुग्णही वाढत चालले आहेत. दम्याचा आजार असलेले अनेकजण तर अंथरुणालाच खिळत आहेत. बदलत्या वातावरणासोबतच अस्वच्छता, धुळीचे प्रमाणही विविध आजारांना निमंत्रण देत आहे. याबाबत कोणीच बोलत नसल्याने हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. दोघांचा बळी गेल्यानंतरही जाग कुणालाच आली नाही, ही मोठी शोकांतिका आहे.रक्तजल नमुने तपासणीचा अहवालही अप्राप्तच४जिल्हा आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करून संशयीत डेंग्यू आजार असलेल्या रूग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात येत आहेत. सध्या जिल्हाभरात ही मोहिम सुरू असली तरी, प्रत्येक्षरित्या उपाय-योजना होताना कुठे दिसत नाही. आरोग्य केेंद्र नर्सी अंतर्गत दाटेगाव येथे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या पथकाने भेट देऊन गृहभेटी घेतल्या. दरम्यान तापीच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. व संशयित १८ रुग्णांचे रक्त जल नमुने घेण्यात आले होते. यासह विविध गावांना भेटी देऊन अनेक रूग्णांचे रक्तजल नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले. परंतु अद्याप सदर अहवाल अप्राप्तच आहेत.

 

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHealthआरोग्य