शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

हिंगोली जिल्ह्यात डेंग्यूचे थैमान कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:57 IST

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यू आजाराने थैमान घातले असून दोघांचा बळीही गेला. आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप तपासणी अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यू आजाराने थैमान घातले असून दोघांचा बळीही गेला. आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप तपासणी अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला नाही.जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दिवसेंदिवस तापाचे व इतर साथरोग लागण झालेले रूग्ण येत आहेत. परंतु मागील एक महिन्यात डेंग्यूसदृश्य आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आरोग्य विभागाकडून खेडोपाडी जाऊन रक्तजल नमुने घेतले जात आहेत. शिवाय अबेटिंग व धूर फवारणी केली जात आहे. उपाय-योजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र डेंग्यू आजाराच्या रूग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. विशेष म्हणजे शहरी भागात मात्र धूरफवारणीकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. हिंगोली शहरात पालिकेकडून साधी धूरफवारणी होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. नगरसेवकही हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, डासांचा उपद्रव वाढत असून तापाच्या रूग्णांत वाढ होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हिंगोली शहरातील मिलिंद कॉलनी येथील शशिकला शिरपले (३७) या महिलेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना जिल्हा रुग्णालयात घडली होती. यापुर्वीही एका मुलीचा डेंग्यूने संशयास्पद मृत्यू झाला होता. परंतु याबाबत जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डेंग्यूच्या आजाराचे जिल्ह्यात थैमान सुरू असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणाही निद्रावस्थेत आहे.आरोग्य यंत्रणेकडून डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करणे गरजचे आहे. तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक काळ ताप कमी होत नसेल तर तो डेंग्यूचा असू शकतो़ तापीमध्येच पोट दुखणे, अंग, डोके दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे, अंगावर पुरळ येणे, अंग सुजणे, डोळे लाल होणे अशी तापीची लक्षणे आहेत़कोरडा दिवस राबविण्याचा पत्ता नाही४जिल्ह्यात सगळीकडूनच डेंग्यूसदृश्य आजाराबाबत तक्रारी वाढल्या आहेत. खाजगी रुग्णालयात अनेक रुग्ण पॉजिटीव्ह आढळले. तरीही जिल्हा प्रशासन मात्र या सर्व प्रकारावर उपाय राबविताना दिसत नाही. निदान कोरडा दिवस पाळण्याचा उपाय तरी घोषित करणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील साचलेले गटार, डबके, टायर, करवंट्यात साचलेल्या पाण्याची स्वच्छता याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय साथरोग बाबतही जनजागृती नाही.रोजच दोनशेवर रुग्ण४दरम्यान अनेक खाजगी रुग्णालयात दररोज दोनशेवर रुग्ण व्हायरल, डेंग्यू व इतर आजारांचे येत आहेत. यात प्रामुख्याने तापाचा आजार जडलेला रुग्णांचा मोठा समावेश आहे. एकतर शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचे रुग्णही वाढत चालले आहेत. दम्याचा आजार असलेले अनेकजण तर अंथरुणालाच खिळत आहेत. बदलत्या वातावरणासोबतच अस्वच्छता, धुळीचे प्रमाणही विविध आजारांना निमंत्रण देत आहे. याबाबत कोणीच बोलत नसल्याने हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. दोघांचा बळी गेल्यानंतरही जाग कुणालाच आली नाही, ही मोठी शोकांतिका आहे.रक्तजल नमुने तपासणीचा अहवालही अप्राप्तच४जिल्हा आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करून संशयीत डेंग्यू आजार असलेल्या रूग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात येत आहेत. सध्या जिल्हाभरात ही मोहिम सुरू असली तरी, प्रत्येक्षरित्या उपाय-योजना होताना कुठे दिसत नाही. आरोग्य केेंद्र नर्सी अंतर्गत दाटेगाव येथे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या पथकाने भेट देऊन गृहभेटी घेतल्या. दरम्यान तापीच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. व संशयित १८ रुग्णांचे रक्त जल नमुने घेण्यात आले होते. यासह विविध गावांना भेटी देऊन अनेक रूग्णांचे रक्तजल नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले. परंतु अद्याप सदर अहवाल अप्राप्तच आहेत.

 

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHealthआरोग्य