शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

१०८ रुग्णवाहिकेमुळे मिळाले हजारो रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:03 IST

जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिका क्रमांकाची सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ रूग्णांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांसाठी आपात्कालीन रूग्णवाहिका जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात एकूण १२ रूग्णवाहिकेद्वारे रूग्ण व जखमींना सेवा दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिका क्रमांकाची सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ रूग्णांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांसाठी आपात्कालीन रूग्णवाहिका जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात एकूण १२ रूग्णवाहिकेद्वारे रूग्ण व जखमींना सेवा दिली जात आहे.आपत्कालीन वेळेत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाकडून १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा हिंगोलीत पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ जणांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गरोदर मातांना १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळावेळी धावून गेल्याने १७३५० मातांना मदत झाली. रस्त्यावरील भीषण अपघातात झालेले जखमी, हृदयविकार, हाणामारीत जखमी झालेले व्यक्ती तसेच विषबाधा, विजेचा शॉक यासह इतर रुग्णांना जवळील रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात रूग्णवाहिकेची मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांना वेळेत दाखल करून घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. गंभीर रूग्ण रूग्णालयात आणताना अनेकदा कठीण प्रसंगानाही चालकांना तोंड द्यावे लागते. ट्रॅफिक किंवा रेल्वेगेटजवळ रूग्णवाहिका अडकून पडतात. त्यामुळे अशा परिस्थितीत जोखीम अधिकच वाढते.अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका ताबडतोब घटनास्थळी पाठविण्याचे नियोजन असते. या क्रमांकावर दूरध्वनी आल्यानंतर हे नियोजन तत्काळ करण्यासाठी यंत्रणा कायम सज्ज ठेवावी लागते. अपुऱ्या यंत्रणेमुळे कठीण प्रसंगी मोठी कवायतही करावी लागते. तसेच गरोदर माता, अपघातग्रस्त जखमींना रूग्णवाहिकेमुळे मदत होत आहे. मागील पाच वर्षांत अपघातातील ३८६९ जखमींना रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात दाखल केले, असे १०८ रूग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. ईनायततुल्ला खाँन यांनी सांगितले.१०८ रूग्णवाहिकेत नियमाप्रमाणे ३ डॉक्टर सेवा देण्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु रूग्णवाहिकेत दोनच डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांना अनेकदा डबल ड्यूटी करावी लागते. शिवाय तसे नियोजन केले जाते. तात्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी १०८ या रूग्णवाहिकेत गंभीर रूग्ण असल्याने याकामी अनेक डॉक्टर जबाबदारी घेण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे डॉक्टरांचा तुटवडा असतो, असे संबंधित विभागातर्फे सांगण्यात आले. १०८ रूग्णवाहिकेत अत्याधुनिक यंत्रणा व सुविधा उपलब्ध असल्या तरी डॉक्टरांची रिक्त पदे भरणे तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Hingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीHealthआरोग्य