शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१०८ रुग्णवाहिकेमुळे मिळाले हजारो रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:03 IST

जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिका क्रमांकाची सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ रूग्णांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांसाठी आपात्कालीन रूग्णवाहिका जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात एकूण १२ रूग्णवाहिकेद्वारे रूग्ण व जखमींना सेवा दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिका क्रमांकाची सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ रूग्णांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांसाठी आपात्कालीन रूग्णवाहिका जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात एकूण १२ रूग्णवाहिकेद्वारे रूग्ण व जखमींना सेवा दिली जात आहे.आपत्कालीन वेळेत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाकडून १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा हिंगोलीत पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ जणांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गरोदर मातांना १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळावेळी धावून गेल्याने १७३५० मातांना मदत झाली. रस्त्यावरील भीषण अपघातात झालेले जखमी, हृदयविकार, हाणामारीत जखमी झालेले व्यक्ती तसेच विषबाधा, विजेचा शॉक यासह इतर रुग्णांना जवळील रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात रूग्णवाहिकेची मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांना वेळेत दाखल करून घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. गंभीर रूग्ण रूग्णालयात आणताना अनेकदा कठीण प्रसंगानाही चालकांना तोंड द्यावे लागते. ट्रॅफिक किंवा रेल्वेगेटजवळ रूग्णवाहिका अडकून पडतात. त्यामुळे अशा परिस्थितीत जोखीम अधिकच वाढते.अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका ताबडतोब घटनास्थळी पाठविण्याचे नियोजन असते. या क्रमांकावर दूरध्वनी आल्यानंतर हे नियोजन तत्काळ करण्यासाठी यंत्रणा कायम सज्ज ठेवावी लागते. अपुऱ्या यंत्रणेमुळे कठीण प्रसंगी मोठी कवायतही करावी लागते. तसेच गरोदर माता, अपघातग्रस्त जखमींना रूग्णवाहिकेमुळे मदत होत आहे. मागील पाच वर्षांत अपघातातील ३८६९ जखमींना रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात दाखल केले, असे १०८ रूग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. ईनायततुल्ला खाँन यांनी सांगितले.१०८ रूग्णवाहिकेत नियमाप्रमाणे ३ डॉक्टर सेवा देण्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु रूग्णवाहिकेत दोनच डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांना अनेकदा डबल ड्यूटी करावी लागते. शिवाय तसे नियोजन केले जाते. तात्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी १०८ या रूग्णवाहिकेत गंभीर रूग्ण असल्याने याकामी अनेक डॉक्टर जबाबदारी घेण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे डॉक्टरांचा तुटवडा असतो, असे संबंधित विभागातर्फे सांगण्यात आले. १०८ रूग्णवाहिकेत अत्याधुनिक यंत्रणा व सुविधा उपलब्ध असल्या तरी डॉक्टरांची रिक्त पदे भरणे तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Hingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीHealthआरोग्य