शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्णयाला खंडपीठाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:21 IST

मागील काही दिवसांपासून जि.प.सदस्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण करणारा ३0५४ व ५0५४ लेखाशिर्षाबाबतच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जि.प.सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देशासनाचे जि.प.ला आले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील काही दिवसांपासून जि.प.सदस्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण करणारा ३0५४ व ५0५४ लेखाशिर्षाबाबतच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जि.प.सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.६ आॅक्टोबर रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार वार्षिक योजनेतील ३0५४ व ५0५४ या दोन्ही लेखाशिर्षांतर्गतच्या कामांसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समिती गठित करण्यात आली होती. त्यामुळे या निधीतून इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार या समितीकडे जात होते. या शासन निर्णयाच्या विरोधात सर्वच जिल्हा परिषदांमधून ओरड सुरू झाली होती. काही जि.प.च्या पदाधिकाऱ्यांनी यात याचिकाही दाखल केल्या होत्या. हिंगोलीतून जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ती दाखल झाली. मात्र त्यावर सुनावणीच बाकी आहे. तर भंडारा जि.प.चे अध्यक्ष रमेश दयाराम डोंगरे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात १७ आॅक्टोबर २0१८ रोजी खंडपीठाने ६ आॅक्टोबरच्या ग्रामविकासच्या आदेशास स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत या शासन निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे पत्र ग्रामविकास मंत्रालयाचे उपसचिव प्रकाश वळवी यांनी सर्व जिल्हाधिका-यांना दिले आहे.२५ आॅक्टोबरच्या या पत्राची प्रत प्राप्त होताच जि.प.सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या याचिकेमुळे भविष्यात दिलासा मिळण्याची अपेक्षा या सर्वांना दिसून येत आहे. तर या शासन निर्णयास स्थगिती मिळाल्याने पूर्वीच्या निर्णयानुसार नियोजनाच्या कामाला लागण्याचाही मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.आंदोलन स्थगित : सदस्यांना आवाहनजि.प.सदस्यांमध्ये ३0५४ व ५0५४ च्या निधीवरून असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी सदस्यांनी ३0 आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. कालच जि.प.त पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमिवर जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले, या निधीबाबत शासनाचे पत्र जि.प.ला प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता ३0 आॅक्टोबर रोजी आंदोलन करण्यात येणार नाही. जि.प.सदस्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन केले.आता जि.प.सदस्यांना केवळ दलित वस्ती सुधार योजनेतील गतवर्षीच्या रखडलेल्या कामांना पुन्हा कधी प्रारंभ होणार याचीच चिंता आहे. ते झाल्यास नवीन नियोजन करणेही शक्य आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीOrder orderआदेश केणेHigh Courtउच्च न्यायालयHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद