शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बैलाच्या धडकेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 14:31 IST

शेतकरी पुंजाजी रानबा कांबळे (६५) यांना १३ नोव्हेंबर रोजी बैलाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

नांदापूर (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील शेतकरी पुंजाजी रानबा कांबळे (६५) यांना १३ नोव्हेंबर रोजी बैलाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अखेर नांदेड येथे उपचारादरम्यान त्यांचा २६ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.

पुंजाजी कांबळे यांनी शेतात काम करण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याचा बैल आणला होता. १३ नोव्हेंबर रोजी स्वत:च्या शेतात बैलाला घेऊन जाताना मागून जोराची धडक दिली होती. यामध्ये पुंजाजी कांबळे हे गंभीर जखमी झाले होते. नातेवाईकांनी जखमी अवस्थेत त्यांना हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

गंभीर जखमी असल्याने २४ नोव्हेंबर रोजी त्यांना डॉक्टरांनी नांदेडला हलविण्याचे सांगितले. त्यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. करवाडी येथील स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. घटनेने करवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीFarmerशेतकरीhospitalहॉस्पिटल