शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

दांडेगावकरांमुळे साखर उद्योगाला चांगले दिवस येणार -टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST

हिंगोली येथील शिवलीला लॉन्सच्या परिसरात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आ. ...

हिंगोली येथील शिवलीला लॉन्सच्या परिसरात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आ. सतीश चव्हाण, आ. तानाजी मुटकुळे, आ. राजू पाटील नवघरे, माजी आ. भाऊ पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, गजानन घुगे, रामराव वडकुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी टोपे पुढे म्हणाले की, राज्यात तसेच देशामध्ये उसाचे उत्पादन क्षमतेपेक्षा अधिक झाले असून, अधिकचा झालेला ऊस कसा गाळप करावा, याबाबत योग्य निर्णय ते घेतीलच. देशात उसाऐवजी बीटपासून साखरनिर्मिती करण्याबाबत त्यांनी विदेश दौराही केला आहे. त्यामुळे पुढील काळात देशात उसासोबतच बीटपासूनही साखरेचे उत्पादन होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाला एमआरआय मशीन देऊ व रिक्त जागा भरल्या जातील, असेही ते म्हणाले.

यावेळी दांडेगावकर म्हणाले, साखर कारखानदारीसाठी चांगले काम करण्यासाठी मिळालेल्या संधीमुळे तसे काम निश्चित उभे करू, तर पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन हिंगोली जिल्ह्याचा उद्योग जिल्हा हा ठसा मिटविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चव्हाण यांच्याकडे शिकवणी लावली पाहिजे

नगरसेवक व्हायचे असेल, तर उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याकडे शिकवणी लावली पाहिजे. राज्यात कोणतेही सरकार असो, निधी कसा मिळवावा, विकासकामे कशी करावीत, हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असे सांगत दिलीप चव्हाण यांच्या कामाचे टोपे यांनी कौतुक केले.