शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पीक नुकसान पंचनाम्यांना पावसाचा व्यत्यय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:07 IST

Rain hits farmers waiting for help : सततच्या पावसामुळे प्रशासकीय यंत्रणाही पेचात

ठळक मुद्देसप्टेंबरचे पंचनामे अद्याप अपूर्ण पीकविम्यासाठी पंचनाम्यांची प्रतीक्षा

हिंगोली :  चालूवर्षीच्या खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ६ हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला; मात्र सप्टेंबरमध्ये १.५० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असताना १४ आॅक्टोबरपर्यंतही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. अधूनमधून सुरूच असलेल्या पावसामुळे या प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांचे म्हणणे आहे. 

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, कापूस आणि विशेषत: सोयाबीन ही सर्वच पीके पूर्णत: पाण्याखाली सापडली होती. बहुतांश ठिकाणी सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना चक्क कोंब फुटल्याचाही प्रकारही घडला. नुकसानीतून काहीअंशी बचावलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी काढणी केली; परंतु एकरी उत्पन्नात विक्रमी घट आली आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे पाठविणे आवश्यक असताना पंचनाम्यांची प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मदत नेमकी कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे.

सततच्या पावसामुळे प्रशासकीय यंत्रणाही पेचातयासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या भागात नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, त्याच भागात काही दिवसातच पुन्हा धो-धो पाऊस होऊन नुकसान झाल्याचा प्रकार घडल्याने दुसऱ्यांदा पंचनामे करावे लागत आहेत. यामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोरही मोठा पेच निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय ढगाळी वातावरण कायम असून अधूनमधून पाऊसही कोसळत असल्याने पंचनामा प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहे. या अडचणींमुळेच प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागत आहे. असे असले तरी लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही लोखंडे यांनी दिली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊसFarmerशेतकरी