शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; पीक नुकसान पंचनाम्यांना पावसाचा व्यत्यय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:07 IST

Rain hits farmers waiting for help : सततच्या पावसामुळे प्रशासकीय यंत्रणाही पेचात

ठळक मुद्देसप्टेंबरचे पंचनामे अद्याप अपूर्ण पीकविम्यासाठी पंचनाम्यांची प्रतीक्षा

हिंगोली :  चालूवर्षीच्या खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ६ हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला; मात्र सप्टेंबरमध्ये १.५० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असताना १४ आॅक्टोबरपर्यंतही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. अधूनमधून सुरूच असलेल्या पावसामुळे या प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांचे म्हणणे आहे. 

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, कापूस आणि विशेषत: सोयाबीन ही सर्वच पीके पूर्णत: पाण्याखाली सापडली होती. बहुतांश ठिकाणी सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना चक्क कोंब फुटल्याचाही प्रकारही घडला. नुकसानीतून काहीअंशी बचावलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी काढणी केली; परंतु एकरी उत्पन्नात विक्रमी घट आली आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे पाठविणे आवश्यक असताना पंचनाम्यांची प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मदत नेमकी कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे.

सततच्या पावसामुळे प्रशासकीय यंत्रणाही पेचातयासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या भागात नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, त्याच भागात काही दिवसातच पुन्हा धो-धो पाऊस होऊन नुकसान झाल्याचा प्रकार घडल्याने दुसऱ्यांदा पंचनामे करावे लागत आहेत. यामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोरही मोठा पेच निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय ढगाळी वातावरण कायम असून अधूनमधून पाऊसही कोसळत असल्याने पंचनामा प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहे. या अडचणींमुळेच प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागत आहे. असे असले तरी लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही लोखंडे यांनी दिली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊसFarmerशेतकरी