शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

अतिवृष्टीत केवळ कळमनुरी तालुक्यातच नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST

हिंगोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांना १ ते १० सप्टेंबरच्या काळात दोन- दोनदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. काही मंडळांचा अपवाद वगळला, ...

हिंगोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांना १ ते १० सप्टेंबरच्या काळात दोन- दोनदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. काही मंडळांचा अपवाद वगळला, तर सर्वत्रच ही परिस्थिती होती. मात्र, केवळ कळमनुरी तालुक्यातच अतिवृष्टीत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात सध्या कृषी विभागाला कोणी वालीच नाही. प्रभारीवर कारभार सुरू असल्याने कृषी सहायक नावाचा घटक कुणालाच कधी जुमानत नाही. शिवाय महसूल विभागाकडेही अनेक लोकप्रतिनिधींनी निवेदने दिल्यानंतरही अतिवृष्टीत सरसकट नुकसान झाले नसले तरीही नदी, नाले, ओढ्याकाठच्या अनेक शेतकऱ्यांना फटका बसल्याने निदान तेवढ्यांना तर मदत मिळेल, अशी अपेक्षा लागली होती. जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी अतिवृष्टीतील नुकसानीबाबत प्रशासनाला निवेदने दिली आहेत. सर्वच तालुक्यांतून तशा तक्रारी आल्या. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची छायाचित्रेही झळकली. मात्र, पंचनाम्यात हे प्रकार न आल्याने यामागचे गणित कळायला मार्ग नाही.

जिल्हा प्रशासनाकडे फक्त कळमनुरी तालुक्याचाच पीक नुकसानीचा अहवाल आला आहे. या तालुक्यातील पाच मंडळांमध्ये ५३ गावांतील ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे ८९१९ हेक्टर पीक क्षेत्र अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडले आहे. यापैकी ७६६६ शेतकऱ्यांचे ६८३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. या तालुक्यांसह इतर तालुक्यांतही जीवितहानी, घरांची पडझड, गुरे वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचाच केवळ अहवाल देण्यात आला आहे.

सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले आहे. ६७१२ शेतकऱ्यांच्या ६१९४ हेक्टर पिकाला फटका बसला, तर हळदीचे ३२० शेतकऱ्यांचे २१५ हेक्टरवर नुकसान तरकेळीचे ६३४ शेतकऱ्यांचे ४२५ हेक्टरचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८३४ असून २०८५ हेक्टर एवढे क्षेत्र आहे.