शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत केवळ कळमनुरी तालुक्यातच नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST

हिंगोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांना १ ते १० सप्टेंबरच्या काळात दोन- दोनदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. काही मंडळांचा अपवाद वगळला, ...

हिंगोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांना १ ते १० सप्टेंबरच्या काळात दोन- दोनदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. काही मंडळांचा अपवाद वगळला, तर सर्वत्रच ही परिस्थिती होती. मात्र, केवळ कळमनुरी तालुक्यातच अतिवृष्टीत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात सध्या कृषी विभागाला कोणी वालीच नाही. प्रभारीवर कारभार सुरू असल्याने कृषी सहायक नावाचा घटक कुणालाच कधी जुमानत नाही. शिवाय महसूल विभागाकडेही अनेक लोकप्रतिनिधींनी निवेदने दिल्यानंतरही अतिवृष्टीत सरसकट नुकसान झाले नसले तरीही नदी, नाले, ओढ्याकाठच्या अनेक शेतकऱ्यांना फटका बसल्याने निदान तेवढ्यांना तर मदत मिळेल, अशी अपेक्षा लागली होती. जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी अतिवृष्टीतील नुकसानीबाबत प्रशासनाला निवेदने दिली आहेत. सर्वच तालुक्यांतून तशा तक्रारी आल्या. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची छायाचित्रेही झळकली. मात्र, पंचनाम्यात हे प्रकार न आल्याने यामागचे गणित कळायला मार्ग नाही.

जिल्हा प्रशासनाकडे फक्त कळमनुरी तालुक्याचाच पीक नुकसानीचा अहवाल आला आहे. या तालुक्यातील पाच मंडळांमध्ये ५३ गावांतील ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे ८९१९ हेक्टर पीक क्षेत्र अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडले आहे. यापैकी ७६६६ शेतकऱ्यांचे ६८३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. या तालुक्यांसह इतर तालुक्यांतही जीवितहानी, घरांची पडझड, गुरे वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचाच केवळ अहवाल देण्यात आला आहे.

सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले आहे. ६७१२ शेतकऱ्यांच्या ६१९४ हेक्टर पिकाला फटका बसला, तर हळदीचे ३२० शेतकऱ्यांचे २१५ हेक्टरवर नुकसान तरकेळीचे ६३४ शेतकऱ्यांचे ४२५ हेक्टरचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८३४ असून २०८५ हेक्टर एवढे क्षेत्र आहे.