शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत केवळ कळमनुरी तालुक्यातच नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST

हिंगोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांना १ ते १० सप्टेंबरच्या काळात दोन- दोनदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. काही मंडळांचा अपवाद वगळला, ...

हिंगोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांना १ ते १० सप्टेंबरच्या काळात दोन- दोनदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. काही मंडळांचा अपवाद वगळला, तर सर्वत्रच ही परिस्थिती होती. मात्र, केवळ कळमनुरी तालुक्यातच अतिवृष्टीत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात सध्या कृषी विभागाला कोणी वालीच नाही. प्रभारीवर कारभार सुरू असल्याने कृषी सहायक नावाचा घटक कुणालाच कधी जुमानत नाही. शिवाय महसूल विभागाकडेही अनेक लोकप्रतिनिधींनी निवेदने दिल्यानंतरही अतिवृष्टीत सरसकट नुकसान झाले नसले तरीही नदी, नाले, ओढ्याकाठच्या अनेक शेतकऱ्यांना फटका बसल्याने निदान तेवढ्यांना तर मदत मिळेल, अशी अपेक्षा लागली होती. जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी अतिवृष्टीतील नुकसानीबाबत प्रशासनाला निवेदने दिली आहेत. सर्वच तालुक्यांतून तशा तक्रारी आल्या. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची छायाचित्रेही झळकली. मात्र, पंचनाम्यात हे प्रकार न आल्याने यामागचे गणित कळायला मार्ग नाही.

जिल्हा प्रशासनाकडे फक्त कळमनुरी तालुक्याचाच पीक नुकसानीचा अहवाल आला आहे. या तालुक्यातील पाच मंडळांमध्ये ५३ गावांतील ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे ८९१९ हेक्टर पीक क्षेत्र अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडले आहे. यापैकी ७६६६ शेतकऱ्यांचे ६८३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. या तालुक्यांसह इतर तालुक्यांतही जीवितहानी, घरांची पडझड, गुरे वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचाच केवळ अहवाल देण्यात आला आहे.

सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले आहे. ६७१२ शेतकऱ्यांच्या ६१९४ हेक्टर पिकाला फटका बसला, तर हळदीचे ३२० शेतकऱ्यांचे २१५ हेक्टरवर नुकसान तरकेळीचे ६३४ शेतकऱ्यांचे ४२५ हेक्टरचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८३४ असून २०८५ हेक्टर एवढे क्षेत्र आहे.