शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
5
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
6
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
7
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
8
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
9
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
10
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
11
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
12
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
13
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
14
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
15
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
16
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
17
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
18
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
19
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
20
वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता; महापालिका पुन्हा अॅक्शन मोडवर, विकासकामांवर 'वॉच', अभियंते, पर्यावरण विभागातील अधिकारी, पोलिस करणार पाहणी
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधांना शिथिलता देताच बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

६ मे रोजी दहा दिवसांनंतर सर्वच बाजारपेठेतील दुकानांना शिथिलता मिळाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. ...

६ मे रोजी दहा दिवसांनंतर सर्वच बाजारपेठेतील दुकानांना शिथिलता मिळाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. ११ वाजेपर्यंतच दुकानांना मुभा असताना गर्दी मात्र दोन वाजेपर्यंत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. हिंगोली जिल्ह्यात बाजारपेठेतील निर्बंध उठले की नागरिक शिस्त पाळायला विसरत असल्याचे चित्र कायम दिसून येते. मात्र ही शिस्त पाळली तर कोरोनाचा कहरही कमी होईल आणि बाजारपेठेवर येणारे निर्बंधही येणार नाहीत, या अंगाने कोणीच विचार करायला तयार नाही.

दुकानांवर गेल्यावर शिस्तीत सामाजिक अंतराचा नियम पाळून खरेदी केल्यास आपण कोरोनापासून बचाव करू शकतो, याचा विसरच पडतो. खरेदीची घाईच एवढी असते की, त्यात सामाजिक अंतराचे पालनच केले जात नाही. शिवाय अजूनही अनेकांना मास्कचे महत्त्व कळाले नसल्याचे दिसत आहे. जुजबी रुमाल बांधण्याचीही तसदी अनेकजण घेत नाहीत. एवढेच काय तर अनेक विक्रेत्यांनाही आज मास्क नसल्याचे दिसून येत होते. अनेक दुकानांवरील गर्दी तर जीवघेणी होती. भाजीपाला विक्रेत्यांनी मोकळ्या मैदानावर थाटलेल्या दुकानांवर मात्र चांगले अंतर राखल्याचे दिसून येत होते, तर अनेक ग्राहकही त्यामुळे सामाजिक अंतराचा नियम पाळताना दिसत होते.

आता एक दिवसाचा ब्रेक

दहा दिवसांनंतर बाजारपेठ उघडल्यामुळे कदाचित अनेक ठिकाणी गर्दी झाली असावी. मात्र, आता एक दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा बाजारपेठ उघडली जाणार आहे. त्यामुळे आता यावेळी तरी गर्दी होणार नाही, अशी काळजी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. बाजारपेठेत नागरिकांचा वावर तर राहणार आहे, मात्र सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा नियम पाळणे गरजेचे आहे.