शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

निर्बंधांना शिथिलता देताच बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

६ मे रोजी दहा दिवसांनंतर सर्वच बाजारपेठेतील दुकानांना शिथिलता मिळाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. ...

६ मे रोजी दहा दिवसांनंतर सर्वच बाजारपेठेतील दुकानांना शिथिलता मिळाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. ११ वाजेपर्यंतच दुकानांना मुभा असताना गर्दी मात्र दोन वाजेपर्यंत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. हिंगोली जिल्ह्यात बाजारपेठेतील निर्बंध उठले की नागरिक शिस्त पाळायला विसरत असल्याचे चित्र कायम दिसून येते. मात्र ही शिस्त पाळली तर कोरोनाचा कहरही कमी होईल आणि बाजारपेठेवर येणारे निर्बंधही येणार नाहीत, या अंगाने कोणीच विचार करायला तयार नाही.

दुकानांवर गेल्यावर शिस्तीत सामाजिक अंतराचा नियम पाळून खरेदी केल्यास आपण कोरोनापासून बचाव करू शकतो, याचा विसरच पडतो. खरेदीची घाईच एवढी असते की, त्यात सामाजिक अंतराचे पालनच केले जात नाही. शिवाय अजूनही अनेकांना मास्कचे महत्त्व कळाले नसल्याचे दिसत आहे. जुजबी रुमाल बांधण्याचीही तसदी अनेकजण घेत नाहीत. एवढेच काय तर अनेक विक्रेत्यांनाही आज मास्क नसल्याचे दिसून येत होते. अनेक दुकानांवरील गर्दी तर जीवघेणी होती. भाजीपाला विक्रेत्यांनी मोकळ्या मैदानावर थाटलेल्या दुकानांवर मात्र चांगले अंतर राखल्याचे दिसून येत होते, तर अनेक ग्राहकही त्यामुळे सामाजिक अंतराचा नियम पाळताना दिसत होते.

आता एक दिवसाचा ब्रेक

दहा दिवसांनंतर बाजारपेठ उघडल्यामुळे कदाचित अनेक ठिकाणी गर्दी झाली असावी. मात्र, आता एक दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा बाजारपेठ उघडली जाणार आहे. त्यामुळे आता यावेळी तरी गर्दी होणार नाही, अशी काळजी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. बाजारपेठेत नागरिकांचा वावर तर राहणार आहे, मात्र सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा नियम पाळणे गरजेचे आहे.