शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

निर्बंधांना शिथिलता देताच बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

६ मे रोजी दहा दिवसांनंतर सर्वच बाजारपेठेतील दुकानांना शिथिलता मिळाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. ...

६ मे रोजी दहा दिवसांनंतर सर्वच बाजारपेठेतील दुकानांना शिथिलता मिळाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. ११ वाजेपर्यंतच दुकानांना मुभा असताना गर्दी मात्र दोन वाजेपर्यंत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. हिंगोली जिल्ह्यात बाजारपेठेतील निर्बंध उठले की नागरिक शिस्त पाळायला विसरत असल्याचे चित्र कायम दिसून येते. मात्र ही शिस्त पाळली तर कोरोनाचा कहरही कमी होईल आणि बाजारपेठेवर येणारे निर्बंधही येणार नाहीत, या अंगाने कोणीच विचार करायला तयार नाही.

दुकानांवर गेल्यावर शिस्तीत सामाजिक अंतराचा नियम पाळून खरेदी केल्यास आपण कोरोनापासून बचाव करू शकतो, याचा विसरच पडतो. खरेदीची घाईच एवढी असते की, त्यात सामाजिक अंतराचे पालनच केले जात नाही. शिवाय अजूनही अनेकांना मास्कचे महत्त्व कळाले नसल्याचे दिसत आहे. जुजबी रुमाल बांधण्याचीही तसदी अनेकजण घेत नाहीत. एवढेच काय तर अनेक विक्रेत्यांनाही आज मास्क नसल्याचे दिसून येत होते. अनेक दुकानांवरील गर्दी तर जीवघेणी होती. भाजीपाला विक्रेत्यांनी मोकळ्या मैदानावर थाटलेल्या दुकानांवर मात्र चांगले अंतर राखल्याचे दिसून येत होते, तर अनेक ग्राहकही त्यामुळे सामाजिक अंतराचा नियम पाळताना दिसत होते.

आता एक दिवसाचा ब्रेक

दहा दिवसांनंतर बाजारपेठ उघडल्यामुळे कदाचित अनेक ठिकाणी गर्दी झाली असावी. मात्र, आता एक दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा बाजारपेठ उघडली जाणार आहे. त्यामुळे आता यावेळी तरी गर्दी होणार नाही, अशी काळजी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. बाजारपेठेत नागरिकांचा वावर तर राहणार आहे, मात्र सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा नियम पाळणे गरजेचे आहे.