शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पौराेहित्य करणाऱ्या वर्गावर कोरोनाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:30 IST

हिंगोली: कोरोना महामारीचा फटका शेती, व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालयांना तर बसलाच आहे. त्याचबरोबर धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहितांना बसल्याने ...

हिंगोली: कोरोना महामारीचा फटका शेती, व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालयांना तर बसलाच आहे. त्याचबरोबर धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहितांना बसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोणताही धार्मिक विधी पार पाडायचा झाल्यास पुरोहितांची गरज भासते. पण, गत १५ महिन्यांपासून कोरोनाने धार्मिक विधीवरच वक्रदृष्टी टाकली आहे. कोरोना संसर्गाचा धोका ओळखून शासनाने सर्वच सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे पौराेहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

२३ मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट सर्वत्र घोंगावत आहे. त्यामुळे साखरपुडा, मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, दशक्रिया विधी, सत्यनारायण पूजा, उपनयन संस्कार आदी धार्मिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या करायचे नाहीत, असे शासनाने सांगितले आहे. त्यामुळे पुरोहितांची उपासमार होऊ लागली आहे. पुरोहितांमध्ये काही कुटुंब अशी आहेत, की ज्यांचा उदरनिर्वाह धार्मिक विधीवरच अवलंबून आहे. परंतु हा धार्मिक विधी बंद असल्याने त्यांची चांगलीच ओढाताण होत आहे.

प्रतिक्रिया

जून महिन्यातील मुहूर्ताकडे लक्ष

एप्रिल महिन्यात ८ मुहूर्त होते, तेही असेच गेले. सध्या मे महिन्यात १६ मुहूर्त आहेत. पण, संचारबंदीमुळे कार्यक्रम करता येत नाहीत. यानंतर जून महिन्यात ८ मुहूर्त आहेत. जून महिना तरी हातून जाऊ नये म्हणून पुरोहितांनी चक्क देवाला साकडे घातले आहे. याचबरोबर शासनाने आमचा विचार करावा.

- संतोषगुरू अगस्ती, हिंगोली

शासनाने आर्थिक मदत करावी

कोरोना महामारीमुळे दीड वर्षापासून उपासमार होत आहे. धार्मिक कार्यक्रमांना शासनाने सूट दिल्यास कुटुंबाचा गाडा चालू शकतो. सर्व बाबींचा विचार करुन शासनाने पुरोहितांना सर्वतोपरी आर्थिक मदत करावी.

- सोहनगुरू महाराज पुरोहित, सेनगाव